राजकीय
महापुरुषांना जातीच्या चौकटींमध्ये अडकवू नका – ॲड. प्रदीप वळसे (पाटील)
बोभाटा न्यूज : मानवता हाच धर्म समजून महापुरुषांनी जाती पातीचा चौकटी तोडून सक्षम समाज व सुदृढ संपन्न देश बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्यांना जातीच्या चौकटीत अडकवून आपली विकासाची गती रोखू नका असे प्रतिपादन भीमाशंकर सह साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप(दादा) वळसे पाटील यांनी केले.
घोडेगाव (ता.आंबेगाव ) येथे युगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉं साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण माध्य विद्यालय आंबेगाव वसाहत येथे प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनी मानवता हाच धर्म समजून सकल मानव जातीच्या उद्धारासाठी कार्य केले आहे इतिहासात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा,संत सावतामाळी यासारखे अनेक संत तसेच समाज सुधारकांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातले त्यांच्या व सक्षम व्यवस्था निर्माण केली अशा महापुरुषांना जाती पातीचा चौकटीत न बांधता त्यांचे विचार आत्मसात करून सक्षम समाज व्यवस्था निर्माण करून मानवता हाच खरा धर्म आहे व तो टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की या महापुरुषांच्या कार्याची महती सामान्य माणसाच्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य युगप्रवर्तक प्रतिष्ठाण सारख्या संस्थांच्या माध्यमातून केले जाते म्हणून तळागाळातील वंचित घटकासाठी काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ मॉं साहेब ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते . .या वर्षी शिरूर तालुक्यातील वात्सल्य सिधु फाउंडेशनच्या सौ उषाताई वाखारे याना राजमाता जिजाऊ मॉं साहेब आदर्श महिला पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिव्याख्यात्या सौ राजश्रीताई तिटकारे याना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श महिला पुरस्कार तर आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावचे युवा उद्योजक अशोक कोळप याना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यात विशाखा विठलराव वाढणकर गडचिरोली यांचा प्रथम क्रमांक तर मोहिनी वाघमारे घोडेगाव यांचा द्वितीय क्रमांक तर विशाखा धुडसे चंद्रपूर याचा तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ ज्योती रोकडे नारायणगाव याना देण्यात आला कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करून स्वागत गीताने आणि सावित्रीबाई फुले यांच्या ओव्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या नंतर युगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यानो कार्यक्रमाचे प्रास्तविक केले आलेल्या सर्व मान्यवर यांचे शाल गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पुरस्कार वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माऊली अप्पा घोडेकर, शरद सह बँकेच्या संचालिका रुपालिताई झोडगे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रकाश घोलप, भीमाशंकर सह साखर कारखान्याचे संचालक सीताराम लोहट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे, घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे, युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या कार्यकारी संचालक कविता खरात, आंबेगाव वसाहत च्या सरपंच प्रमिला घोलप, घोडेगावच्या माजी सरपंच क्रांतीताई गाढवे, अनुसया पत संस्थेच्या संचालिका ज्योती घोडेकर, माधवी कर्पे, रुपाली जांबुकर, कांचन गायकवाड, खंडू खंडागळे, अशोक काळे, साईनाथ बोऱ्हाडे, प्रशांत माटे, मयुरी लोहकरे, खंडू थोरात, अमोल काळे, हुसेन शेख, गणेध भास्कर, सुनिल झोडगे, अंजली आंधळे, पत्रकार मोसिंन काठेवाडी, शिवाजी गाडे, मुख्याध्यापक अविनाश ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले आभार प्रकाश घोलप यांनी मानले.