सामाजिक

महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी : योगी आदित्यनाथ

Published

on

आळंदी ता. ११ : महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे असे गौरवोद्गार उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे बोलताना केले.

या वेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले कि, मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे.

दरम्यान गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आनंदसोहळ्याला उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती महाराज, बाबा रामदेव, हभप शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, उमा खापरे, संजय भेगडे, मुरलीधर मोहोळ, लीलाधर काळे, संजय मालपाणी आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version