राजकीय
हिरड्याला हमीभाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार – शिवाजीराव आढळराव (पाटील)
आदिवासी भागातील उत्पन्ना चे हिरडा हे एकमेव हक्काचे साधन असून नैसर्गिक आपत्तीमुळे हिरड्याचे हक्काचे उत्पन्न हातीं गेल्याने आदिवासी शेतकऱयापुढे आर्थिक संकट निर्माण होते त्यामुळे हिरड्याला योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केले
खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील आदिवासींचे हिरडा हे एकमेव हक्काचे व आर्थिक गणिताचे उत्पादन असून नैसर्गिक आपत्तीमुळे गेली अनेक वर्षे यास योग्य भाव मिळत नसल्याने आदिवासी शेतकर्याचे आर्थिक गणित बिघडले आहे यांच्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा यांच्या वतीने आदिवासी शेतकार्यानी बेमुदत उपोषण केले त्यावेळी माजी खासदार आढळराव बोलत होते ते पुढे म्हणाले की हिरड्याच्या हक्काच्या उपणामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आपली मुले शहरी भागात शिकविण्यासाठी हातभार मिळाला यात बाळ हिरडा,मोठा हिरडा,भादवडी हिरडा,कळी असे विविध प्रकारचे हिरडा आदिवासी बांधवान कडून त्या त्या वे ळेत जमा केला जातो व याचं हिरड्याच्या उत्त्पन्ना वर आज पर्यंत प्रपंच उभे राहिले..म्हणता म्हणता आदिवासी समाजाची पहिली शिक्षित पिढी ही हिरड्याच्या उत्पन्नावर शिकली मोठी झाली,नोकरी पाण्याला लागली.
परंतु निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात हिरडया चे नुकसान झाले व आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित बिघडले आधीच कोरोना सारखी महामारी त्यात नोकरी नाही व निसर्ग कोपला ” आता जगायचं तरी कस? ” हा प्रश्न घेऊन इतर शेतकऱ्यां सारखं खचून आत्महत्या करणारातला आदिवासी समाज नाही तो लढतोय व या लढ्यात मी या समाजाचा एक कर्ता मुलगा म्हणून आदिवासी समाजा सोबत या लढ्यात शेवटच्या क्षणा पर्यंत उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे…
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर ,शिवसेना नेते सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू आदी कार्यकर्ते उपस्थित होते
लवकरच मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून येत्या काही दिवसात हिरड्याच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा करून योग्य मार्ग काढून आदिवासी बांधवाना न्याय देण्या साठी करीबद्ध राहणार – शिवसेना उपनेते .खासदार आढळराव