राजकीय

जनतेशी नाळ जोडलेल्या व काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या मागे एकतेची  वज्रमूठ निर्माण केली पाहिजे -उपमुख्यमंत्री अजित पवार

Published

on

मंचर (प्रतिनिधी)- सामान्य जनता जेव्हा आम्हाला मतदान करते तेव्हा त्यांचा विकास करणे हे आमचे काम आहे त्यामुळे सत्तेमध्ये राहूनच काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीप काँग्रेसने केला आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले 

आंबेगाव तालुक्यामध्ये सुमारे 400 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा उदघाटन व भूमिपूजन सोहळा तसेच शेतकरी मेळावा पार पडला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके , माजी आमदार पोपटराव गावडे , तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुशेठ हिंगे यांनी आपले विचार व्यक्त केले 

या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार आपले मत व्यक्त करताना त्यांनी विरोधकांवर सडेतोड टिका केली ते पुढे म्हणाले की की , दहा जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा सोनियाजी बरोबर आपले विचार जुळत नव्हते  तरीइ चार नाहिन्यातच आपण त्यांच्या बरोबर सरकार मध्ये गेलो, विजासाचे पाऊल उचळलेले तसेच आताही आम्ही सत्तेत जाऊन चुकीचे काही करणार नाही  गेली तीस ते बत्तीस वर्षे समाज्यात काम करत तुमचे सर्वांचे प्रेम तुमचा विश्वास मिळविणे तसेच मतदारसंघाचा व  समाज्याचा सर्वांगीण विकास करणे ही आमचे कर्तव्य आहे 

आज काही लोक बोलत असतात सरकार वर टीका करत असतात  परंतु आपण विकासासाठी काम केलं पाहिजे फक्त स्वाभिमानाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करून जमणार नाही  काही लोकांनी मधल्या काळात आंबेगावात सभा घेतली त्यात स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या तुम्ही नीट आठवा तीन पक्षात फिरून येणारांनी  स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या असतात का?, तुम्ही गुगलवर जावं तुम्हाला  कळेल काही जणांनी सत्तेसाठी किती  कोलांटी उडया मारल्या  अशी टीका अजित पवार यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता केली. ते पुढे म्हणाले की काही लोक उगाचच स्वतः ला मोठं समजायला लागतात प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तो दिला आहे परंतु आम्ही विकासाला साथ देणारे आहोत व आपणही जनतेशी नाळ जोडलेल्या व काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या मागे एकतेची   वज्रमूठ निर्माण केली पाहिजे

 त्यामुळे फक्त विरोधाला विरोध करून विकास होणार नाही त्यासाठी सत्तेत राहून दोनहात करीत राज्यातील सर्व मतदार संघात विकास पोहचविण्यासाठी स्वाभिमान जागृत ठेवावा लागतो केंद्राकडून जास्तीत जास्त निधी राज्यात आणला जातो आज देशात सर्वात प्रगत राज्य म्हणून फुले ,शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राकडे पाहिले जाते

दरम्यान या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह, भीमाशंकर सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, पुणे जिल्हा परिषदेचव उपाध्यक्ष विवेक वळसे मगलदास बांदल पंचायत समिती माजी उप सभापती संजय गवारी घोडेगाव माजी उपसरपंच सोमनाथ काळे मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वामी थोरात,आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version