सामाजिक
स्वताचा मुलगा देशसेवेसाठी अर्पण करताना, त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना व कष्टांना सलाम करीत मुलाचे कौतुक करताना आनंदाश्रूंनी पान्हावले शेतकरी पुत्राचे डोळे,
मुलगा कर्तबगार झाला की सदैव करारी अवाजात वावरणाऱ्या बापाचे स्वप्न साकार होते. आणि आपसूकच कौतुकाने बापाचे हृदय आनंदाने भरून जाते.कठोर वागत मुलांना संस्कार देणाऱ्या त्यावडिलांच्या डोळ्याच्या कडा केंव्हा पाणावतात व समुद्राला उधाण यावे अशा पद्धतीने बापाचे मन आनंदाने भरून जाते त्यावेळी त्या मुलाच्या कौतुकाअर्थ लिहिलेल्या चार ओळी इतरांना नक्कीच स्फूर्ती देतील यात शंका नाही
अकोले तालुक्यातील उंच खडक परिसरातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुरेश नवले यांना समाज कार्याचा सुरवातीपासूनच उत्साह असणाऱ्या अशा समाज सेवकाचा मुलगा ‘यश’ हा स्वताच्या चिकाटीच्या जोरावर सैन्यात भरती होतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे या यश नवले नावाच्या मुलांसाठी त्याचेच वडील सुरेश नवले यांनी लिहिलेले दोन शब्द त्याच्याच लिखाणातून मांडत आहे सुरेश नवले लिहिताना असे सांगतात की ,
मुलगा यश याचे जीवन कसे घडले हे मुलाचे कौतुक म्हणून नाही तर सैन्य भरतीचे स्वप्न बाळगून असलेल्या अशा असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी परिश्रम करून देशसेवेत सहभागी व्हावे म्हणून यांनी थोडक्यात त्यांचा मुलगा ब्रिगेडियर ऑफ द गार्ड पदापर्यंत कसा पोहोचला हे अतिशय सह्दयी अंतःकरणाने आपणापुढे मांडली आहे. ते म्हणतात
अकोले शहरातील ‘यश मटैर्ननेटीक होम नावाच्या दवाखान्यात माझ्या मुलाचा जन्म झाला म्हणून मी मुलाचे नाव यश ठेवले तो पुढे जाऊन एवढे मोठे यश संपादन करील असे कधीच मणातही नव्हते. पण कु.यशची प्रचंड जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर व त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक,त्याने ज्या करीअर अकॅडमींत शिक्षण घेतले त्या अकॅडमीतील मार्गदर्शक आणि स्वतः यश ने घेतलेलेथक परिश्रम यामुळे आपल्या जीवनात यशस्वी ठरलेल्या यशची यशोगाथा आपणा पुढे व आपल्या पाल्यांपुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे
यश पहाटे पाच वाजता उठून घरचे गाईंची कामे आटपून सायकलवर अकोले शहरात जाऊन अकोले शहरातील सर्वात मोठ्या आय टी आय ग्राऊंडवर आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पळनं असेल किंवा मैदाना वरील इतर व्यायाम झाल्यानंतर पुन्हा सायकल प्रवास सुरू होयी अकोले तालुक्यातील असा एकही घाट नसेल ज्या ठिकाणी माझा मुलगा यश गेला नसेल अकोले तालुकाच काय शेजारी पेमगिरी आणि बाळेश्वर सारख्या घाटात सायकलवर प्रवास करणाऱ्या माझ्या मुलाचे सायकल पुराण सांगितले तेवढे कमीच आहे .
अकोले तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर प्रवास करणारा माझा मुलगाही .कुठल्याही मोठ्या शहरात शिक्षणाला जाण्याचा हट्ट न करता.अतिशय कमी पैशात आपल्या मायभुमीत शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांवर बोजा न टाकणारा यश आज मोठ्या यशाचा वाटेकरी ठरल्याचा मनस्वी आनंद होत आहे.
माझा मुलगा देशसेवेत रूजू होतोयं त्याने आजपर्यंत आम्हा शेतकरी मायबापाच्या वेदना स्वतः आमच्या खांद्याला खांदा लावुन सहन केल्या.आता देशाचा शिपाई होऊन जवानांच्या वेदना झेलण्यासाठी तो देशसेवेत रूजू होण्यासाठी जातोयं त्यास आपण सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात आणि आपल्या मुलांनाही माझ्या यशची जिद्द त्याचा आत्मविश्वास व कष्टाची कहाणी ऐकवून जास्तीत जास्त मुलं केंद्र शासनाच्या नोकरीत जाऊन त्यांनी आपले करीअर करावे
समाज्याचे हित जोपासण्याची इच्छा मनातूनच असावी लागते …..समाज हित जोपासताना ते रक्तातूनच येते अहोरात्र समाज्यासाठी झगडणारे शेतकरी पुत्र सुरेश नवले यांच्या मुलाच्या चिकाटीच्या गाथा आपल्या शब्दात मांडली ती अनेक मुलांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही