राजकीय

युवा नेत्यांकडून पत्रकारांना कोकण वारी,हि कोणत्या निवडणुकीची तयारी

Published

on

सद्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असल्याने प्रसिद्धी झोतात येण्यासाठी कोण काय शक्कल लावेल काही सांगता येत नाही..? काही योजना करतानाही गुप्त कराव्यात असे म्हटले जाते. परंतु एका कथाकथीत युवा नेत्याने मात्र प्रसिद्धी झोतात राहण्याच्या हव्यासापोटी काही पत्रकारांना  स्वखर्चाने कोकण दर्शन सहल  घडवली असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. 

 त्यामुळे “युवा नेत्यांकडून कोकण वारी, कोणत्या निवडणुकीची तयारी ..?”अशी एक चर्चा  तालुक्यात सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

      तालुक्यात अनेकांना दिवसा स्वप्न पडताना दिसत आहेत. काही वर्षापूर्वी टेलिव्हिजन वर एक मालिका प्रचंड गाजली होती त्या मालिकेचे नाव होते. “मुंगेरीलाल के हसीन सपने”  अशा अनेक मुंगेरीलाल यांचा तालुक्यात सुळसुळाट झाला असल्याचे बोलले जात आहे. काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना तर दिवसा आमदारकीची किंवा खासदारकीची, जिल्हा परिषद ,पंचायत समिती पदाची स्वप्न पडताना दिसत आहेत.

 काही ठिकाणी आयोजित सभांमध्ये व्यासपीठावर चमकेशगिरी करून आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत. अशा अविर्भावात ते वावरत  असतात.  आपल्या पूर्वजांच्या  किंवा वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या पुण्याईवर पंचायत समिती जिल्हापरिषद सरपंच पद किंवा या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद मिळाले म्हणून असे अनेक स्वयं घोषित युवा नेते अर्ध्या हळकुंडणे पिवळे होऊन नेता असल्याच्या अविर्भावात वावरत असतात.

  अनेकांना अजूनही समजले नाही की नेता होण्यासाठी मनापासून समाजकार्याची आवड, दूरदृष्टीकोण,मुत्सद्देगिरी, काहीतरी मिळविण्याचे ध्येय व सर्वात महत्वाचे म्हणजे सातत्य हवे असते. आपल्या वाड-वडिलांच्या पुण्याईने त्यांना समाजात स्थान मिळाले पण ते टिकवून ठेवण्यासाठी स्वतः चे समाजाप्रतीचे योगदान ओळखण्या ऐवजी प्रसिद्धी क्षेत्रातील काही प्रतिनिधींना रिजविण्याचा प्रयत्न करून  वर्तमान पत्र किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर थोडस नाव झळकल की अशा स्वयंघोषित नेत्यांना आसमंत ठेंगण होते आहे.

दरम्यान   एका मोठ्या नामांकित संस्थेवर महत्वाचे पद भूषवित असलेल्या या युवा नेत्याच्या गेल्या दोन पिढ्या प्रामाणिकपणे समाज सेवा करीत आहेत. असा प्रचंड वारसा असलेल्या युवा नेतृत्वाकडून तालुक्यातील जनतेच्या नक्कीच योग्य अपेक्षा आहेत. मात्र त्यांना कोणत्या निवडणुकीची स्वप्ने पडत असावीत. कोण जाणे?   होऊ घातलेल्या  महत्वपूर्ण अनेक निवडणुकांमध्ये एखादी निवडणूक लढविण्याचे मनसुबे असावेत म्हणून तथाकथित  युवा नेत्याने काही पत्रकारांना कोकण दर्शन वारी घडविली.    या कोकण वारीत सर्व सामील मीडिया प्रतिनिधींचा सर्वतोपरी खर्च या नेत्याने आपल्या हस्तकामार्फत केला असल्याचे अनेकांच्या मुखातून ऐकावयास मिळते.  या पत्रकारांमध्ये सहली दरम्यान काही पत्रकारांना योग्य सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने तात्विक वाद झाले व हे “कोकण वारीचे” भिंग समाजात फुटले  व  तालुक्यात ही सहल एक चर्चेचा विषय ठरू लागली आहे… 

समाजमान्य नेता होण्यासाठी समाजाशी नाळ जुळणे गरजेचे असते. समाजाचा मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी आपले समाजाप्रतीचे योगदान असणे आवश्यक आहे. एके काळी सत्तेत असलेल्या राहुल गांधीं यांनाही समाजातील सर्व सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी समाजात येऊन सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडण्यासाठी भारत-जोडो यात्रेचे आयोजन करून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत सर्वसामान्य गरीब जनतेच्या व्यथा समजावून घेत विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे लागले आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार, उद्धव ठाकरे, या सारख्या अनेक मोठ्या   नेत्यांना ही आपली छबी समाजमनावर ठसविण्यासाठी जनतेमध्ये  येऊन काम करावे लागत आहेत. त्यामुळे समाजाचा विश्वास संपादन करणे किती महत्वाचे आहे. याची जाणीव अशा कथा-कथित युवा नेत्यांना केंव्हा होणार हाच एक संशोधनाचा भाग म्हणावा लागेल. कारण आपले कर्तृत्व असेल तर ते कोणीही लपवू शकत नाही. त्यासाठी असे कोणाचे लांगुलचालन करण्याचीही काही आवश्यकता नसते.

 समाजाप्रतीचे आपले योगदान हीच खरी आपल्या प्रसिद्धीची पावती असून समाज मनावर आपले नाव कोरन्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते.  अशा युवा नेतृत्वाला समजू नये ही शोकांतिका म्हणावी लागेल. एकाने अनेक वर्षांपूर्वी  असे म्हटले आहे की “या विश्वाचे कल्याण होऊदे”,या मागचा त्याचा हेतू विचारला असता त्या महान व्यक्तीने म्हटले की या विश्वात आपणही येतो म्हणजे आपसुकच परमेश्वर आपलेही कल्याण करतो म्हणजेच परमार्थातून गरजेपुरता स्वार्थ साधलाही जातो देण्याची वृत्ती ठेवली कि निसर्ग त्याला भरभरून देतो असे म्हणतात 

 परंतु परमार्थ व कर्तृत्व मात्र शून्य व स्वप्न मोठी मोठी हा निसर्ग तरी अशा स्वयंघॊषित नेत्यांची इच्छा पूर्ण करील की नाही यात शंकाच आहे. असो सध्या  अनेकजण असेही  म्हणत आहेत की, ‘कोकणवारी  लई भारी मीडयावाले वरपतात मच्छी करी’ हा मोठा हास्य कल्लोळाचा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version