राजकीय

वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार

Published

on

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तशीच राजकारणामध्ये वेगाने बदल घडत आहेत. देशाच्या व राज्याच्या राजकारणात जशी नवीन  समीकरणे दररोज उदयास येत आहेत. तसेच आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये एक जुनेच समीकरण नव्याने जुळले आहे. याला योगायोग म्हणावा कि, ऐकमेतील निस्वार्थी  आत्मिक प्रेम त्यामुळे आज तालुक्यातील “थ्री ,डी” (दादा म्हणजेच शिवाजीराव आढळराव, दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शाह ) हे तीन मित्र  पुन्हा एकत्र येत आहेत. 

ज्या राजकारणाने  २००३ साली यांना एकमेकांपासून दूर केले तेच राजकारण यांना एकत्र आणीत आहे. हा विधीचा खेळच अजब आहे निसर्गातील कोणतीच गोष्ट विनाकारण होत नाही व घडते तेही चांगल्या साठीच घडते असे म्हणतात .  कुणीतरी म्हटलेच आहे दुनिया गोल आहे. सकाळी अन्नासाठी  उडालेली पाखरं संध्याकाळी एकत्र तसेच काहीसे घडत आहे.   या तिघां जीवलग मित्रांच्या मनोमिलनामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू…. तर अनेकांच्या डोळ्यात आसू…… हि स्थिती पहावयास मिळणार, मात्र  हे  नियतीचे गणित अनेकांच्या दृष्टीने अनाकलनीय असले. तरी पुढील काळात याची उत्तरे मिळतील यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

 गेली वीस वर्षांपूर्वी एकदिलाने राहणारी राजकारणात एकत्रित काम करणारी, शिवाजीराव आढळराव उर्फ दादा, प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह, तसेच राज्याचे  सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील या तीन मित्रात अनेक अकलनिय ,अनाकलनीय कारणामुळे मतभेद निर्माण होऊन दरी निर्माण झाली होती. यासही राजकारण जबाबदार असल्याचे त्याकाळातील तालुक्याच्या राजकारणात समावेश असलेल्या  अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. राजकारणात स्वतःला सिद्धकारण्याच्या दृष्टीने घेतलेले निर्णयाने तिघे तब्बल वीस वर्षे वेगळे राहिले तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुजलेल्या अविरत घट्ट मैत्रीच्या धाग्यामुळे, निसर्गाने पुन्हा 20 वर्षांनंतर  राजकारणाच्या पटलावर अशी स्थिती निर्माण केली की, आज हे मित्र पुन्हा एकत्र येत आहेंत. 

 एकेकाळी दिलीप वळसे पाटलांच्या मागे सावली सारखे उभे राहणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी “होय मी नाराज आहे” असे म्हणत  वळसे पाटील यांची साथ सोडुन स्वतः ला राजकारणात सिद्ध करण्यासाठी त्यांनी  मंचर (ता आंबेगाव) येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे शिवनेरीच्या कुशीतून निवडून येऊन शिवसेनेचा भगवा दिल्लीच्या तक्तावर रोवण्याचा शब्द दिला व तो एकदा नाही तर तीनदा पूर्ण हि केला.

त्यावेळी पासून शिवसेनेचा जिल्ह्याचा गड सांभाळत, शिवाजीराव आढळराव यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतः ला सिद्धहि केले. व तब्बल तीन पंचवार्षिक निवडणुकातून  दिल्लीच्या संसदेत जनतेचे प्रश्न मांडत राहिले. व जनहिताच्या अनेक प्रश्नांची सक्षमपणे सोडवणूक करून मतदार संघाच नव्हे, तर राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नही केले. तेव्हापासून आज पर्यंत तब्बल वीस वर्षे हे वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव हे दोन मित्र, कट्टर राजकीय शत्रू होऊन आपआपले व आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी व त्यातून जिल्यातील जनतेची सेवा करण्यासाठी झटत होते.

गेल्या वीस वर्षाच्या पूर्वी निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रगतीच्या वाटांमध्ये तिघेही यशस्वी झाले. दिलीप वळसे पाटलांनी राज्याच्या राजकारणात आपला  प्रभाव निर्माण करीत अनेक मंत्री पदे सांभाळत सक्षम राजकीय वाटचाल केली तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वताची वेगळी वाट निवडून स्वतःच्या कर्तृत्वाने तब्बल तीनवेळा विरोधकांना धूळ चारत  देशाच्या राजकारणात यशस्वी धडक दिली तर देवेंद्र शाह यांनी आपल्या उद्योग क्षेत्रात नवनिर्मिती करत सर्व साधारण दूध संकलन केंद्र सुरु करून त्याचे रूपांतर एका सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीत केले आज जगाच्या बाजार पेठेत गोवर्धन कंपनीने आपला नावलौकिक व दबदबा निर्माण केला आहे. देवेंद्र शाह यांनी यशस्वी उद्योजक होऊन औद्योगिक क्षेत्रातील अवकाशाला कावेत आणण्यासाठी गरुड झेप घेत यशस्वी गगन भरारी मारली व हे तिन्हींनी मित्र आपआपल्या क्षेत्रात  स्वतः ची योग्यता सिद्ध करण्यात आज यशस्वी झाले. हाच यांच्या सचोटीचा धडा पुढील नवयुवकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

राज्याच्या व देशाच्या राजकारणात झालेले अनपेक्षित बदल मात्र आंबेगाव कारणांसाठी सुवर्ण पर्वणीच ठरणार आहे. यात काही शंका नाही कारण  वीस वर्षांपूर्वी एकत्रित पणे पाहिलेली स्वप्ने या तीन दिग्गजाच्या एकत्र येण्याने पूर्ण होणार अशी अपेक्षा जुने जाणकार बोलून दाखवत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करताना जीवनात अनेक प्रकारच्या धक्का तंत्राचे हलाहल विष पचवत हे ” त्रिदेव” ऐकत्र येत असल्याने आंबेगाव तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्याच्या राजकारणातही खूप बदल दिसून येतील यात शंका नाही 

शिरूर लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. वळसे पाटलाचा राजकीय गाडा अभ्यास, व  म्हणतात ना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व नियोजन अमित शाह पहातात तसेच आंबेगाव मध्ये हि देवेंद्र शाह यांचे नियोजन जे भल्या भल्याची भंबेरी उडवून देणार, यात कोण्या जोतिष्याची गरज नाही. असो राजकारणामुळे वीस वर्षाच्या  पूर्वी वेगवेगळे झालेले तीन जिवलग मित्र पुन्हा राजकारणाच्या गणितामुळेच पुन्हा एकत्र येत आहेत. मनाच्या तारा जुळत आहेत त्यातून मैत्रीच्या अनाभाकांची गीते पुन्हा नव्याने सर्वाना ऐकावयास मिळतील या सारखे सूंदर ते काय ? असेल

देशासाठी लोकसभेची निवडणूक काहीही निकाल देवो, परंतु आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या मनात निकाल आजच लागला आहे. काळरात्र संपून तालुक्यात पुन्हा विकासाची एकोप्याची समृद्धतेची  पहाट झाली असे म्हणावयास काही हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version