राजकीय
शिरुरचे लोकसभेचे उमेदवार आढळराव पाटील, पण ” अग्नी परीक्षा मात्र मंत्री दिलीप वळसे पाटलांची”…..
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमी वर आज (दि २६ रोजी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंचर(ता.आंबेगाव) येथे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे .परंतु लोकसभेची खरी परीक्षा मात्र सहकार मंत्री वळसे पाटलांसोबत येथील इतर राष्ट्रवादीच्या सत्ताधारी आमदारांना द्यावी लागणार आहे.
लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार कोण उमेदवार असणार या सारख्या अनेक निवडणूक पूर्व चर्चांना आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या राष्ट्रवादी काँग्रे पक्षातील प्रवेशामुळे पूर्ण विराम मिळणार आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सुदोपसुंदींना संपून शिरुर च्या मैदानात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे, कोणते उमेदवार आता आमनेसामने असणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
राजकारणात कोणी कुणाचा मित्रही नसतो आणि कोणी कुणाचा शत्रूही नसतो.त्यामुळे काल पर्यंत एकमेकांचे तोंड पाहण्यास उत्सुक नसलेले नेते कालांतराने एकमेकांच्या गळ्यात हात घालून जनतेला अभिवादन करीत असतात.
राजकारणात आजचे जिवलग मित्र, उद्याचे विरोधक तर आजचे विरोधक उद्याचे जिवलग असू शकतात.गेल्या वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार मोहिते पाटील यांच्यात अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असलेले पहावयास मिळाले. त्यामुळे अनेकांच्या मते यांच्यात असलेले वाद मिटू शकत नाही असेही सांगितले जात होते.
परंतु राजकारणातील आराखडे गेल्या काही वर्षांत इतके बदलले कि जे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हटले जात ते आज एका व्यासपीठावर बसून एकमेकांना आलिंगन देणार आहेत. तर होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकदिलाने एकत्रित काम करून आजच्या राजकीय पटलावर राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव पाटलांच्या रूपाने एक हक्काचा शिलेदार निवडून देणार आहेत
.
शिरुर लोकसभेची सर्व कमान राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वर अवलंबून असणार आहे. सध्याचे राजकीय परिस्थितीत वळसे पाटील व त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार यांचे अस्तित्वच पणाला लागले आहे कारण येणाऱ्या निवडणुकीत शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे समोर उभे आहेत. म्हणजेच ही लढाई घरातच आहे फक्त यात कोण बाजी मारतो ते पाहणे महत्वाचे आहे.
आजच्या निवडणुकीत या लोकसभा मतदार संघात अनेक वर्षे आपला सुभा (विधानसभा क्षेत्र) सांभाळणार्या सर्वांचे आमदारांना आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. कारण या मतदार संघात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना हि मानणार मोठा वर्ग आहे. असे म्हटले जाते त्यामुळे या निवडणुकीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्यासोबत दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची सर्वांची मोठी राजकीय अग्नी परीक्षाच या निवडणुकीच्या निमित्ताने द्यावी लागणार आहे
या निवडणुकीत जर आढळराव पाटील जरी उभे असले तरी खरी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात गेल्या अनेकवर्षाच्या कारकिर्दीत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळणार आहे.
मागील निवडणुकीपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये राज्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा यांच्या पाठीवर हात होता. त्यामुळे त्यांचे पारंपारिक मतदार हि येथील आमदारांच्या दृष्टीने जमेची बाजू होती. परंतु आता मात्र या आमदारांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या विकास कामांचे मूल्यमापन येथील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतदार कसा करतो व आमदारांच्या अवाहनास प्रतिसाद कशा प्रकारे देणार हे पुढील काळात दिसणार आहे.
Sudhir kale
March 27, 2024 at 3:29 am
निवडून येणार नाही. कार्यकर्ते नाराज.