सामाजिक

मीडियाची आभासी हवा ,शिरुरमध्ये खासदार अमोल कोल्हेना तारणार का?

Published

on

शिरुर लोकसभेसाठी महाविकास आघाडी व महा युती यांचे उमेदवार घोषित झाले आहेत. अधिकृत उमेदवारांची घोषणा दोन्हीही पक्षांनी लवकरच केल्यामुळे या मतदार संघात कोण बाजी मारणार? या बाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

 शिरुर लोकसभा मतदार संघात अनुभवी व जुने जाणते तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुलकीचा धागा गोवलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव तर त्यांच्या विरोधात आपल्या बहुचर्चित मालिकेच्या माध्यमातून जनतेत भुरळ पाडणारे खासदार अमोल कोल्हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. व यात कोल्हे यांनी मीडियाच्या माध्यमातून  सध्या प्रचारात आघाडी घेऊन निर्माण झालेली सकारात्मक हवा टिकवून ठेवण्यात खासदार अमोल कोल्हे यशस्वी ठरतील का? हाच चर्चेचा विषय ठरलेला दिसत आहे. 

खासदार  डॉ.अमोल कोल्हे यांना महा विकास आघाडीकडून अगोदरच उमेदवारी साठी हिरवा कंदील मिळाला होता त्यांमुळे त्यांनी मतदार संघातील गावे,वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. खासदार डॉ.कोल्हे एक अभिनेते असल्यामुळे दौरा करताना अनेक लोक विशेषतः महिला व मुले त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात डॉ.अमोल कोल्हे यांनी मतदार संघात आघाडी घेतल्याचे दिसत असले तरी एकंदरीत पाहाता ही प्रचारात घेतलेली आघाडी एक भ्रामक कल्पना ठरण्याची शक्यता दिसत आहे. दौरा संपवून विद्यमान खासदारांनी गावातून पाठ वळविल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या मीडिया इव्हेंट मॅनेजमेन्ट विषयी चर्चा करताना दिसत आहेत यासाठी अनेक कारणे पुढे दिसत आहेत

मतदार संघात मीडिया इव्हेंट मॅनेजमेन्ट हा शब्द मोठ्या प्रमाणावर अनेक नागरिकांच्या मुखातून ऐकावयास मिळत आहे. मतदारसंघात अनेक ठिकाणच्या गाव भेट व वाड्या वस्त्यांवरील भेटी गाठीच्या दौऱ्यात कोल्हे सोबत असलेले काही राज्य पातळीवरील नावाजलेल्या वाहिण्यांचे मीडिया प्रतिनिधी ग्रामस्थांना जे प्रश्न विचारत आहेत. त्याचा अनुषंग पहाता तो समाज हिताचा किंवा विकासाचं नसून राजकीय दृष्टीने  कोल्हेना फायदेशीर ठरणारा प्रश्न, विचारत आहेत. व   थोडा फार शब्दांमध्ये बदल करत वारंवार तसाच प्रश्न मतदारांना  विचारला जात तसेच हेच मीडिया प्रतिनिधी एकत्रितपणे येऊन आढळरावांच्या बाबत गैरसमज निर्माण  करणारे प्रश्न जाणीवपूर्वक विचारत असल्याचे ऐकावयास मिळत आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न मिडिया प्रतिनिधी ठरवून विचारत असल्याचे जाणवत असल्याने मीडिया इव्हेंट मॅनेजमेन्ट बाबत नागरिकांत प्रचंड चर्चा सुरु आहे (क्रमश-)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version