राजकीय
शिरूरच्या मतदारांनी दिली पाच वर्षे कर्तृत्वाची संधी,पण खासदार डॉ अमोल कोल्हे मात्र स्वताच्या कामातच आनंदी
शिरुर लोकसभा मतदार संघात आता तीन उमेदवार उभे राहणार आहेत वंचित ने आपला उमेदवार मंगलदास बांदल यांना मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्याने आता ही निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.त्यामूळे ही निवडणुक पुढे जाऊन खूपच काट्याची होणार असे दिसत आहे.यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या मतदारसंघात डॉ खासदार अमोल कोल्हे यांचे काम दिसत नसून जुमलेबाजी मोठया प्रमाणावर असल्याचे दिसते.सध्याच्या राजकारणामध्ये सर्वसाधारण बहुतेक पुढारयांची काम शून्य, पण आव मात्र मोठा, अशी स्थिती पहावयास मिळत आहे. यातच संधी मिळाल्यानंतर संधीचे सोने करणाराच कर्तृत्ववान म्हटला जातो. पण संधी मिळूनही कर्तृत्व सिद्ध करता येऊ नये या पेक्षा दुसरी नामुष्की काय? अशी स्थिती खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या कार्य शैलीतून गेल्या पाच वर्षात दिसून येते. अभिनेता असणं किंवा चांगलं बोलता येणं म्हणजेच कर्तृत्व सिद्ध होत असे नाही तर निस्वार्थी भावनेतून नागरिकांशी नाळ जुळवून ठेवत आपले पणाचा ‘भाव’, मतदारसंघातील जनतेविषयी सातत्याने वाहता ठेवणे अधिक आवश्यक आहे. तरच विकास कामे केली जाऊ शकतात
कोल्हे यांचे प्रगती पुस्तक, कोरे”
खासदार अमोल कोल्हे हे जरी काही विकास कामे केल्याचा दावा करित असले तरी डॉ.कोल्हे यांचे प्रगती पुस्तक कोरे असल्याची टीका विरोधक करीत आहेत व खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितलेल्या कामांमध्ये असलेली बहुतांश कामे हि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याच कालखंडात मंजुर झाली असल्याचे सर्वज्ञात आहे. परंतु या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मीडिया प्रतिनिधींच्या माध्यमातून घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यात प्रामुख्याने खेड ,मंचर , नारायण गाव बाह्य वळण रस्ता यांचे बोलले जाते
त्याच प्रमाणे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आपल्या स्वप्नातील असलेल्या 300 एकर जमिनीवर होणार असलेल्या मुखचर्चित ज्या इंद्रायणी मेडिसिटी प्रोजेक्ट या विषयी ते काहीच बोलताना दिसत नाहीत . “इंद्रायणी मेगासिटी” हा प्रजेक्ट कसा आहे, या पासून मतदार संघातील मतदारांना काय? , कसा? व कोणता?फायदा होईल हा मेडिसिटी प्रोजेक्ट प्रत्यक्षात केंव्हा? उतरेल, त्या बाबत किती? काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी किती? भूमी संपादन झाली आहे, की नाही . भूसंपादन झाले असेल तर ते कुठे? भूसंपादन झाले आहे. याबाबत चे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. पुणें नाशिक रेल्वे बाबत अनेकदा घोषणा झाल्या या घोषणेवर या मतदार संघात अनेक खासदार या अगोदर निवडून आले. परंतु या प्रोजेक्ट विषयी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी खूप प्रयत्न ही केले. आता कुठेतरी या कामास थोड्याफार प्रमाणात सुरूवात झाली आहे. मग असे असताना कोल्हे यांनी सांगितलेला “इंद्रायणी मेडिसिटी” हा प्रोजेक्ट खरच यशस्वी ठरेल का? त्याच प्रमाणे पुणे शिरुर एलिव्हेटर, नाशिक फाटा ते खेड जवळ असलेल्या चांडोली या दरम्यान असलेला एलिव्हेटेड, शिक्रापूर-चाकण- तळेगाव रस्ता, चाकण कामगार रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी गडावरील रोपवे,
त्याचप्रमाणे खेड जुन्नर आंबेगाव आदिवासी भागात राष्टीय वनौषधी संशोधन संस्था, जुन्नर येथील कुकडेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्रकल्प अशा प्रकारची सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या “विकास पर्व” या पुस्तकातही म्हटले आहे. परंतु या सर्व खासदार डॉ.कोल्हे यांनी केलेल्या घोषणा असून त्यांनी मतदार संघातील काही गावात एसटी थांबे देण्यापालिकडे इतर कोणतेही विकासाचे भरीव काम अद्याप तरी केले नसल्याची चर्चा मतदार संघात आहे. परंतु हा अभिनेता मात्र आपल्या अभिनयातून मतदारांना आशेचे गाजर दाखवून डॉ.कोल्हे मतदारांना भुलवू शकणार नाही,अशी टीका मतदारांतून सुरू आहे.(क्रमश