राजकीय
शिरुर मतदार संघातील बळीराज्याच्या व्यथा मांडण्यात कमकुवत ठरलेल्या,व मतदार संघात ५वर्षे न फिरकणाऱ्या खा. अमोल कोल्हे यांना मतदार कौल देणार का?
( शिरूरचा दावेदार कोण -भाग -3)
शिरूरचा गड जिकण्यासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावत आहेत. महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.. तिकडे महा आधाडीचेही कार्यकर्ते काम करत आहेत. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व राज्याच्या केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या राजकीय आघाताने यांच्या बाबत निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा घेत पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवून संसदेत जाण्याचे दृष्टीने डॉ अमोल कोल्हे आपले नशीब आजमावत आहेत.
खासदार अमोल कोल्हे यानी प्रकाशित केलेल्या आपल्या “विकास पर्व” या पत्रिकेतून अनेक लोकोभिमुख काम करण्याबाबत आश्वासनही दिले आहे. परंतु गेल्या पाच वर्षात ते मतदार संघात कुणाला भेटले अथवा दिसले सुद्धा नाहीत. अशी चर्चा नागरिक करीत असून डॉ. कोल्हेच्या या कृती बाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षात सर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर योग्य उत्तर शोधू न शकल्यामुळे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या बाबत शिरूरचा मतदार काय निर्णय घेणार? लवकरच दिसणार आहे.
गेल्या पाच वर्षात कष्टकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या व्यथा पाहण्याऐवजी पुन्हा खासदारकीची दिवा स्वप्न पाहणाऱ्या अभिनेत्याला आपल्या चंदेरी दुनियेतून वेळ मिळाला म्हणूनच की काय? मतदार संघातील सर्वसामान्य जनता तब्बल पाच वर्षां नंतर दिसली असावी, त्यामुळे पुन्हा चित्रपटातील चंदेरी दुनियेतील चंद्र निवडणुकीत पुन्हा मतदानरुपी आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे.अशी टीका विरोधक करीत आहेत.
शिरुर लोकसभा मतदार संघात चाकण एमआयडीसी, शिक्रापूर एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगर पालिका भाग त्याचा बरोबर अध्यात्मिक मध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर, आळंदी, देहू, श्री क्षेत्र ओझर गणपती, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती,श्री क्षेत्र लेण्याद्री,या समवेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्म ठिकाण,धर्मवीर संभाजीराजे राजे यांचे स्मृती ठिकाण वडू तुळापूर तसेच सुमारे 130 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले भीमाशंकर अभयारण्य या सारखी धार्मिक,ऐतिहासिक, नैसर्गिकरित्या संपन्न, स्थळे येथेच आहेत
शेतकरी वर्गाची होणारी पिळवणूक
शिरूरच्या सर्वसामान्य जनतेच्या उत्पन्नाचे दृष्टीने महत्वाची औद्योगिक विकास क्षेत्र या ठिकाणी असून दऱ्या खोऱ्यानी नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण या विभागातील विविध समस्यांना येथील जनतेला सामोरे जावे लागते या भागात शेती व दुग्ध व्यवसायही हा शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात केंद्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या उदा. दूध पावडर, कांदा,ऊसाची साखर, द्राक्षे आदी शेती उत्पादित मालाची निर्यात बंदी तसेच खाते बी बियाणे, पशुखाद्य या बाबत कंपन्यांकडून होणारी प्रचंड दरवाढ याचा शेतकरी वर्गाच्या आर्थिक जीवन पद्धतीवर प्रचंड प्रभाव पडतो. मागील वर्षी दुधाच्या किमतींमध्ये वाढ झाली. या काळात दुधाचे दर सुमारे ४० रुपयांपर्यंत पोहचले. त्यामुळे दूध व्यवसायात बळीराजाला दोन पैसे मिळुही शेतकऱयांच्या हाताला काही उरले नाही याचे कारण यात एक घटना प्रामुख्याने घडली ती म्हणजे दुधाचे भाव जसे वाढत जात होते तशीच लगेच पशुखाद्य दरात वाढ होत होती. दुधाचा दर लिटरला एक रुपयाने वाढला की, पशूखाद्य दर किलो मागे दहा रुपयांनी वाढत होते. दरम्यानच्या काळात काही दिवसांनी दुधाचे दर लिटरला २५ ते 2७ रुपयांवर आले परंतु पशुखाद्याचे दर मात्र वाढलेलेच आहेत. अशा काळात केंद्रासरकार कडे संसदेत बळीराज्याची बाजू मांडणारा हक्काचा खासदार हवा असतो . परंतु त्यावेळी आदरणीय सांसदपट्टू शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याऎवजी आपल्या चंदेरी दुनियेत व्यस्त होते की काय? अशी चर्चा सुरू आहे.
आजही शेत मालाचे भाव पडलेले आहेत. दुधाला भाव नाही बी बियाणे व पशुखाद्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत व शेतकरी वर्गाची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. व विद्यमान लोकप्रतिनिधी यांची या बाबत ठोस भूमिका नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पालनहार असलेल्या बळीराज्याची मोठी अवहेलना मागील पाच वर्षात झाली आहे. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव मागील वेळी निवडणुकीत पडूनही न खचता मतदार संघात काम करत राहिले असे म्हटले जाते त्यामुळे शिरूरची जनता कोणाच्या पारड्यात आपला मतदान रुपी आशीर्वाद टाकणार हे पाहावे लागणार आहे.