सामाजिक
“राज्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”, पण “जनता मात्र भारनियमनाने झाली त्रस्त”
सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असताना अद्यापही, उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नसले तरीही, सद्या सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जीव ओतून कामाला लागले आहेत.
शिरुर मतदार संघातील ग्रामीण भागात मात्र विजच्या भारनियमनाने शेतकऱ्यांना आणि येथील नागरिकांना जेरीस आणले आहे . मात्र सध्या सर्वच निवडणुकीचा खर्च होतोय वारेमाप, मात्र “शिरूरचे लोकसभेचे मतदार मात्र अंधारात” अशी स्थिती असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
शिरुर , आंबेगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विद्युत भारनियमन सुरू आहे. शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाला भाव नसल्याने सर्वच उत्पादनात बळीराज्याची आर्थिक गळचेपी झाल्याचे दिसते आहे. शेतात असलेली पिके ही विज पुरवठा सुरळीत नसल्याने पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत.
दुसरीकडे उन्हाळा वाढल्याने वन्यजीव प्राणी मानवी वस्त्यांवर आढळून येत असल्याची अनेक चित्रणे मोबाईल पहावयास मिळत आहेत. त्यामुळे बिबट्याचे भीतीने नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. दरम्यान विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करावा या मागणीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार ) कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी विद्युत वितरण कंपनीला लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
दरम्यान विद्युत वितरण कंपनीला पाठविलेल्या निवेदनात निकम यांनी म्हटले आहे कि, सुमारें एक महिन्यापासून आंबेगाव तालुक्यातील काठापुर बु,।।, सबस्टेशन येथून तालुक्यातील मंचर, पिंपळगाव, अवसरीं बु।।,निरगुडसर, लोणी,रांजणी, शिंगवे,व काठापुर बु।। तसेच शिरुर तालुक्यातील कवठे येमाई, मलठण, जांबुत,पाबळ,कान्हूर मेसाई, पिंपरखेड व जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगळूर अशा एकूण 33 के व्ही च्या पंधरा सबस्टेशन ला भारनियमनचा सामना करावा लागत आहे .
सर्व पंधरा सबस्टेशन अंतर्गत सुमारे पन्नास गावे येत असुन या सर्व गावात शेकडो एकर शेती जमिनीवर शेतकाऱ्याची विविध पिके असून , दिवसभरात दोन ते तीन तास देखील वीज पुरवठा होत नाहि त्यामुळे सातत्याने होणाऱ्या भारनियमनाने भर उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे बळीराज्याला अशक्य होतं आहे.
उन्हाची तीव्रता व भारनियमन यामुळे पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत तसेच शेती पंप देखील विजेच्या होणाऱ्या अचानक होणाऱ्या विजेच्या कमी जास्त दाबामुळे खराब होत आहेत. या बाबत लोणी कंद येथील विद्यूत स्टेशन वर चौकशी केली असता असे समजते की, या ठिकाणाहून काठापुर बु।। स्टेशन येथून औद्योगिक वसाहतीसाठी कारखाण्यांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. तर शेतीसाठी मात्र ग्रामिण भागात भारनियम सातत्याने सुरू आहे.
विद्युत वितरण कंपनीने पुढिल काळात शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला आहे.