सामाजिक
ब्रह्मांडाच्या पुनर्निर्माणाचा शिव व शक्ती मिलनाचा महत्वाचा,” विवाह संस्कार°
लग्न संस्कार म्हटल की, समोर उभी राहते सनई, वाजंत्री ,गडबड,मानपान, जेवणावळी, पै पाहुणे यांची ये,जा, कोण? रुसला,…कोण हसला…..!! अनेक क्रिया प्रतिकीया, आनंद उत्साहाचे एक आगळे वेगळे समीकरण…..
खरंतर समीकरण शब्द उच्चारण यास योग्य होईल कीं, नाही माहीत नाही, कारण लग्न म्हटलं तर वाजंत्री,सनई चा सुमधुर स्वर, पै पाहुणे या जरी गोष्टी समोर दिसत असल्या तरी, तो एक संस्कार आहे.
हा संस्कार आहे ब्रह्मांडाच्या पुनर्निर्माणाचा…. ती प्रथा आहे. शिव व शक्तीच्या मिलनाची…. दोन व्यक्ती ज्या, या विश्वाच्या कुठल्याशा कोण्या कोपऱ्यात जन्माला येतात. आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, बोबडे बोल बोलत, त्यांच्या हाताचे बोट पकडून आपल्या अडखळणाऱ्या आयुष्याची सुरुवात करतात. व या जगाच्या राहाड गाडग्यात हे दोघे केंव्हा बाल्य अवस्था सोडून तारुण्यात प्रवेश करतात. हे त्या बिचार्या जन्मदात्यांनाही समजत नाही.
काल पर्वा पर्यंत आपल्या हाताच्या बोटाला धरून हिरमुसलेल्या चेहऱ्याने, आपल्या आई वडिलांकडे पाहणारे ही मुले बाल्यावस्थेतून तारुण्यात केंव्हा? प्रवेश करतात. आणि आपल्या स्वतः च्या विश्वासावर, आत्मबळावर अवघ्या आसमंताला गवसणी घालण्यासाठी सज्ज होतात. अशाच दोन जीवांच्या एकत्रित येण्याचा धर्माचा संस्कार म्हणजे लग्न…
आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील एका शेतकरी कुटुंबातील एक तरुण मिलिंद रोडे (पाटील) आपला वकिली व्यवसाय सांभाळत खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे आपली जीवनसंगिनी सौ का.प्रमोदींनी हिच्या सोबत आपले कौटुंबिक आयुष्य मोठ्या आनंदाने जगात असताना
दरम्यान रोडे (पाटील) कुटुंबियांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण येतो तो त्यांची कन्या वेदांतीच्या रूपाने घरात कन्या रत्न जन्मले म्हणजेच घरात लक्ष्मी मातेच्या वास झाला म्हणून सर्व कुटुंबात आनंदोत्सव होऊ लागला.
दरम्यान सर्व घरात दुडदुडणाऱ्या लहानशा पावलांनी सर्वत्र आनंदाचा वर्षाव केला दिवसामागून दिवस गेले. आज वेदांती च्या जीवनातील महत्वाचा दिवस आज हिंदुधर्म संस्कृती प्रमाणे वेदांती पुनः आपल्या जीवनात “नारायण”रुपी सौरभ समवेत “लक्ष्मी” च्या पावलांनी खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील शांताराम बबन सांडभोर याचा नातू व येथील प्रसिद्ध व्यावसायिक विठ्ठलराव सांडभोर व त्यांची सौभाग्यवती कमल यांचे चिरंजीव सौरभ च्या सोबतीने सांडभोर कुटुंबियांच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने प्रवेश केला आहे.
या निमिताने या विवाह सोहळ्यासाठी सर्वच पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्टांना व प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावून वधूवरांना शुभाशीर्वाद अर्पण केले. अशाच पद्धतीने लग्न संस्काराचे माध्यमातून दोन जीव एकत्र येऊन सुसंस्कृत समाजाचे पुनर्निमितीची वीट ठेवतात आणि या सृष्टीच्या पुनर्निर्माणाचे कार्य सुरू होते म्हणूनच लग्न संस्कारास हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी महत्वाचा संस्कार म्हटले आहे.