राजकीय
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
गेली काही दिवस छोट्याशा अपघाताने रुग्णालयात आजारी असलेले राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव तालुक्यात आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला भिडला असून या उत्साहात वळसे पाटलांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने “टायगर इज बॅक” म्हणत आपला आनंद व्यक्त केला.
देशांमध्ये लोकसभेची निवडणुकीचे महाभारत शिगेला पोहचले आहे.सर्वच पक्ष विरोधकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.शिरुर मतदार संघात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शिरुर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून डॉ अमोल कोल्हे मैदानात आहेत. दोन्हीही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी संपर्क साधून आपले विचार व चिन्ह समजावून सांगत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. सभांमधून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करीत आपली बाजू पटवून देत आहेत.
आंबेगाव तालुक्यात खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या सोबतीला तालुक्यामध्ये राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची ताकद एकत्रित पणे काम करीत आहे. परंतु गेल्या वीस वर्षाच्या कालखंडात माजी खासदार शिवाजीराव आढळराव विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जरी राजकीय समीकरणे बदलली असली तरी अजूनही कार्यकर्त्यांच्या मनातून ती संघर्षाची “सल” अद्यापही पुसली गेलेली नाही. असे दिसून येत आहे.
वळसे पाटील यांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आढळराव पाटलांना तालुक्यातून लीड मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत.वळसे पाटील आजारी असल्यामुळे कार्यकार्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत होती परंतु वळसे पाटील यांचे तालुक्यात आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसत होते.
कार्यकर्त्यांना नेहमी तारणारा – नेता
. यावेळीं बोलताना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणाला की, टायगर इस बॅक, आता तालुक्याचा “वाघ” परत आला आहे. आमचे नेते फक्त दिलीप वळसे पाटील च आहेत. कारण तेच आम्हाला (ने) – नेहमी (ता)- तारतात- आमच्या सुखदुःखात सावली प्रमाणे उभे राहतात. वळसे पाटीलच आमचे खरे नेते आहेत.वळसे पाटील साहेबांनी दिलेला आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे “साहेब” जो आदेश देतील तोच आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करणार व शिवाजीराव आढळराव पाटिल यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
. वळसे पाटील त्यांना पाहूनच कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह वाढला आहे. हे पहाता या निवडणुकीत आंबेगाव व शिरुर तालुक्यातून शिवाजीराव आढळरावांचा विजयाचा मार्ग सुखकर होण्याची शक्यता आहे असे म्हणावयास काही हरकत नाही.