सामाजिक
वाकचातुर्याने भुरळ पाडून , “न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात विरोधक पटाईत”- शिवाजीराव आढळराव पाटील
लांडेवाडी दि. आपल्या वाक चातुर्याने, मतदारांना भुरळ पाडून, इतरांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय स्वतः कडे घेण्यात विरोधी उमेदवार पटाईत आहेत अशी टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली
लांडेवाडी (या.आंबेगाव) येथे झालेल्या एका स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे (पाटील), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णुशेठ हिंगे, भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ.कल्पनाताई आढळराव, तालुका प्रमुख अरुण गिरे, सुनील बाणखेले, उपतालुका प्रमुख विश्वास लोहोट, जि प सदस्य देविदास दरेकर, आदी आदी मान्यवर उपस्थित होते
विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता, टीका करताना, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पुढे म्हणाले की, आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडून फक्त धादांत खोटे बोलत काहीही संबंध नसलेले आरोप करत राहणे ही काहींची प्रवृत्ती असते. खेड जवळ माझी ९६ एकर जमीन आहे असा आरोपही विरोधकांनी केला खेड जवळ विधी महाविद्यालयाजवळ माझी थोडी जमीन होती परंतु ती मी मागेच विकलेली आहे. असेही त्यांनी सांगितले
दरम्यान खेड पासून आळेफाटा प्रयन्त चे सहाही बायपास केल्याचे श्रेय घेण्याचे काम विद्यमान खासदारांनी केले परंतु त्यानंतर नितीन गडकरी यांनी याकामाचे पाठपुरावा मी केल्याचे सांगितल्याचे सर्वसृत झाल्यानंतर या विषयावर त्यांनी बोलणे बंद केले पुढे बोलताना आढळराव म्हणाले की गेल्या वीस वर्षांमध्ये मी शिवसेनेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसमावेत माज संघर्ष झाला तो संघर्ष इतका टोकाचा नव्हता त्याच बरोबर वीस वर्षाआगोदर वळसे पाटील यांच्या समवेत माझे खूप जवळचे संबंध होते त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुन्हा प्रवेश केल्यामुळे मने जुळण्यास काहीच अडचण निर्माण झाली नाही
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले की, दादांचे कार्य आपणास माहिती आहे अडीअडचणीच्या वेळी सर्वसामान्यांना मदत करणे हा दादांचा स्वभाव असल्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे मतदार संघातील जनतेच्याआ व्यथा त्यांना माहीत असतात त्यामुळे मतदार संघाचा खऱ्या अर्थाने विकास करून घेण्यासाठी जनतेशी नाळ जुळलेला खासदार आढळराव यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या प्रसंगी रवींद्र करंजखेले, भाऊ सावंत मंचर शहर अध्यक्ष निलेश (स्वामी) थोरात सागर काजळे तुकाराम काळे,माजी उपसरपंच सोमनाथ काळे आदी उपस्थित होते.