राजकीय
“कर्तृत्वाचा महामेरू” सर्वसामान्यांना अधारू,लोकसेवेशी सदैव तत्पर हा ‘अढळ’ कर्मयोगी…
“कर्तृत्वाचा महामेरू”, सर्वसामान्यांना अधारू,लोकसेवेशी सदैव तत्पर हा कर्मयोगी… गीतेमध्ये म्हटले आहे. की कर्म करत राहा म्हणजे कर्माचे फळ नक्की मिळेल. त्याच उक्तीप्रमाणे परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, यातून धैर्याने मार्ग काढुन सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा नेता म्हणजेच दुसरे तिसरे कोणीही नसून माजी खासदार शिवाजीराव आढळराव होत यांच्या वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जनसेवेचा वसा सांगणारे चार शब्द….
लहान पणापासूनच ध्येयासाठी झटणारा व सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्यरत राहणाऱ्या हा नेत्याने जण सामान्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळविले व सर्वानाच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण केला.
शिवाजीराव आढळराव (दादा) यांची लहानपणी आर्थिक स्थिती खूपच बेताची होती. मोलमजुरी करून पैसे कमविणे व मिळणाऱ्या तुटपुंज्या आमदणीवर घर चालविणे अशा प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असताना, जीवनात काहीतरी व्हायचे या उद्देशाने झपाटलेल्या या तरुण युवकाने गाव सोडून मुंबईला जाणे पसंत केले व जीवनात काहीतरी बनायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते.
दरम्यान मुंबईत राहून या ठिकाणी रात्रीच्या शाळेत जात अभ्यास केला तर दिवसा मिळेल ते काम करून शिक्षण घेतले. त्यानंतर एका कंपनीत काम करत नंतर हळू हळू जम बसवीत स्वतःचा व्यवसाय सुरू केला व आपल्या व्यवसायात यश मिळवत त्यांनी आपल्या व्यवसायास प्रगतीच्या शिखरावर पोहचविले आहे.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सोबत काम करत असताना. आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या व्यथा अडचणींच्या वेळी जातीने सर्वोतोपरी मदत केली व हे समाज सेवा व्रताचे काम मर्यादित न ठेवता सर्वदूर केले व आंबेगाव सोबत जुन्नर, खेड, शिरुर तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण केला. शहरी भागातील मुलाला मिळणाऱ्या सुविधा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात व आपला गावाकडचा मुलगा शहरी मुलांसोबत बौद्धिक पातळीवर सक्षमतेने उभा राहावा यासाठी त्यांनी आपल्या गाव लांडेवाडी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. व त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने झपाटलेंल्या शिवाजीरावांनी शिवसेनेतून लोकसभेची निवडणूक लढवून तब्बल तीन वेळा विजय मिळविला. त्यातुन त्यांनी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले यात पुणे नाशिक रेल्वे, पुणे – नाशिक रस्ता, बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी, बैल गाडा शर्यत, शेतीला पूरक उद्योग, यासोबत कला क्रीडा शौक्षणिक सामाजिक क्षेत्रात विविध सेवा संधी उपलब्ध करून देत विकास कार्याचा डोंगर उभा करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली व सर्व सामान्य शेतकऱ्यासाठी वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली वेळप्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करीत अवघ्या अकरा महिन्यात भीमाशंकर सह साखर कारखान्याची उभारणी करून येथील शेतकऱ्याना उत्पनाचे साधन उपलब्ध करून देत सर्व सामान्य शेतकर्याचे जीवनमान उंचावण्यासाठी उतुंग कामगिरी केली.
शिवाजीरावांनी समाज कार्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या विकास कामामुळे पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांचा विकास होऊन येथील जनतेच्या जीवनमानात आर्थिक स्थैर्य उंचावून कायापालट झाला. यात शंका नसावी
शिवनेरीच्या सानिध्यात व बाराज्यतिर्लिंगांपैकी एक असलेल्या “श्री क्षेत्र भीमाशंकर” च्या परिसरात जन्माला आलेल्या, या “शिवाजीने” आपल्या नावाला साजेल असेच समाजकार्य केले. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण शिवाजी म्हणजे (शिव + आजी) शिव म्हणजे ब्रह्मांडाच्या दैवी ऊर्जा व आजी म्हणजे आज म्हणजेच वर्तमान, म्हणजेच शिवाजी, संपूर्ण ब्रह्मांडात वास्तवात म्हणजेच वर्तमानात सकारात्मक ऊर्जा भरणारा शिवाजी ज्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून विकास करत सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी उतुंग कामगिरी केली व त्यांच्या नावाला शोभेल असे जनतेच्या विकासाचे काम केले शिवाजीराव आढळराव यांनी अहोरात्र “अढळ” पणे अविरत सुरू असलेले कार्य अद्यापही सुरू आहे म्हणूनच त्यांना “कर्तृत्वाचा महामेरू”, सर्वसामान्यांना अधारू,लोकसेवेशी सदैव तत्पर हा “कर्मयोगी” म्हणणे चुकीचे ठरणार नाही.