सामाजिक
“प्रधानमंत्री” सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, ‘महाराष्ट्र बँकेकडून; गरजवंत लाभार्थ्यांना मिळाला दोन लाखाचा धनादेश….
मंचर -(सदानंद शेवाळेयांजकडून)- आंबेगाव तालुक्यातील नारोडी (ता. आंबेगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट या शाखेच्या सहकार्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा-धारकाच्या अपघाती मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांना २ लाख रुपये विमा रकमेचा धनादेश मिळवून देऊन गरीब कुटुंबास आधार दिला.
बॅक ऑफ महाराष्ट्र च्या नारोडी शाखेत २० हजार खातेदार आहेत असून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे या योजने अंतर्गत विमाधारक हौशीराम महादू शेवाळे ,( रा. लांडेवाडी) हे गेल्या २ ते ३ वर्षापासुन प्रतिवर्षी २० रुपये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत नियमित भरत होते.
दरम्यान दि २० फेब्रुवारी रोजी हौशीराम शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. यांच्या मृत्युपश्चात त्यांचा मुलगा सत्यवान हौशीराम शेवाळे आणि पत्नी बेबी हौशीराम शेवाळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यात या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असताना.अशा बिकट समयी बँक कर्मचार्यानी व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नारोडी शाखा व्यवस्थापक श्री. स्वप्निल चोरे यांच्या हस्ते २ लाखाचा धनादेश वितरीत करण्यात आला.
यावेळी बँकेचे अधिकारी सुनील पिंगळे, कॅशियर गौरम मेंगडे, मधुकर झडे तसेच इतर खातेदार उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना या विमा योजनेची माहिती नसतांना शाखा व्यवस्थापकांनी स्वतःहून माहिती देवून धनादेशाचे वितरण केले.
दरम्यान प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ही ९ मे २०१५ पासुन सुरू केलेली टर्म इन्शुरन्स योजना असून यामध्ये योजनेच्या मुदती दरम्यान अपघाती मृत्युच्या बाबतीत संरक्षण दिले जाते. ही योजना एक वर्षासाठी चालते आणि त्यानंतर सतत कव्हरेज साठी नूतनीकरण केले जाऊ शकते. या योजनेचा प्रीमियम सर्वसामान्यांना परवडणारा असून इन्शुअर केलेल्या बँक खात्यातून देय आहे. त्यामुळे कव्हरेज कालावधीत मृत्यूच्या बाबतीत समअशुअर्ड दिले जाते.
दरम्यान वयाच्या १८ वर्षापासून ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. हे एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे जे कव्हरेज कालावधी दरम्यान केवळ मृत्यूचे संरक्षण करते.या योजनेच्या अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिट दिले जात नाही. कव्हरेज एक वर्षासाठी असून प्रत्येक वर्षी १ जून रोजी सुरू होते आणि पुढील वर्षाच्या ३१ मे रोजी संपते.*
या योजनेसाठी प्रीमियम विमा धारकांच्या बँक खात्या द्वारे देय आहे. प्रीमियम ची रक्कम केवळ वार्षिक रू.२० आहे आणि विमा धारकाच्या बँक खात्यातून स्वयं-डेबिट सुविधेने डेबिट केली जाते. इन्शुअर व्यक्तीला ऑटो-डेबिट सुविधा मंजूर करावी लागते जेणेकरुन जेव्हा कव्हरेज सुरू होते आणि जेव्हा नूतनीकरण केले जाते तेव्हा देखील प्रीमियम डेबिट केला जाऊ शकतो. ऑटो-डेबिटची मंजूरी १ जूनपूर्वी देण्यात यावी जेणेकरुन १ जूनपासून कव्हरेज सुरू होईल आणि संपूर्ण वर्षासाठी चालविले जावे.
“प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या सर्व सामाजिक सुरक्षा योजना या शासकीय योजना असून त्या राष्ट्रीयकृत बँके तर्फे राबविण्यात येतात. या मुळे सदर व्यक्ती च्या कुटुंबांना मृत्यूपश्चात विमा योजनेत लाभ होतो.सदर योजनेचा जास्तीत जास्त खाते धारकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन शाखा व्यवस्थापक स्वप्नील चोरे यांनी केले आहे.”*