राजकीय
“दादा”राखेतून विश्व निर्माण करण्याची ताकद अजूनही आहे. “त्यामुळे पुन्हा लढू व ते फक्त जिंकण्यासाठीच”…..
युद्ध असो कि निवडणूक, हार जीत हि होतच असते. म्हणून कोणी विजयाने हुरळून जायचं नसतं….. तर अपयशाने पळून…… पुन्हा राखेतून विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्याकडे आहे. “दादा”….आम्ही तुमच्यासोबत सदैव उभे असू…..पुन्हा लढू व ते फक्त जिंकण्यासाठीच…..
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव (पाटील) यांना निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. परंतु आढळराव यांच्या पराभवानंतर अनेक नागरिकांच्या व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्या .
आढळराव पाटील यांच्या या पराभवामुळे शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदारांना व कार्यकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यात आश्रू मावत नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. अहोरात्र जनतेच्या समस्या सोडविण्यात व समाजसेवेचे व्रत हाती घेऊन मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी झगडणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव असंख्य मतदारांच्या जिव्हारी लागला आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुंबई येथे जाऊन रात्रीच्या शाळेत अभ्यास करून स्वतः च्या कर्तृत्वावर उद्योग विश्वात आपले साम्राज्य निर्माण करतो. त्या नंतर आपल्या गावाकडील माणसांसाठी काहीतरी करावे या हेतूने प्रेरित होतो. आंबेगाव तालुक्यात येऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाजसेवेचे व्रत अंगिकारतो व राजकारणात राहून समाजसेवेचे व्रत स्वीकारून जनतेची सेवा करतो व पुढे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत होतो. अशी आहे माजी खासदार आढळरावांची कहाणी….
माजी खासदार आढळराव पाटील यांच्या पराभवाचे असेही एक कारण मतदारांतून सांगितले जाते की, आपणाला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रात आपणाला ज्ञान देणाऱ्या व्यक्ती खरोखरीच त्या क्षेत्रातील उच्च दर्जाच्या आहेत का? हे जाणणे गरजेचे आहे.
कारण ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्ती आपणासोबत असणे गरजेचे आहे.आपण कोणावर विश्वास ठेवतो आपण कोणाला छत्रछायेत ठेवतो हेही महत्वाचे आहे. कारण २००४ ते २०१९ या काळात शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अविनाश रहाणे यांच्यासारखी अनेक जीवाला जीव देणारी व योग्य नियोजन करणारी मंडळी, माजी खासदार अढळराव पाटील यांच्या सोबत होती. व ही मंडळी योग्य नियोजन करीत होती परंतु नंतरच्या काळात परिपूर्ण नियोजन करणारी अशी अनेक मंडळी बाजूला गेली व तब्बल दोन आढळरावांना पराभव पहावा लागला.
एक कथा सांगितली जाते. एकदा एक गरुड पावसात भिजत असणाऱ्या उंदरांच्या पिलांना,हि पिल्ले भिजू नयेत म्हणून आपल्या पंखांखाली घेतो. कुणाचे तरी चांगले करावे हा प्रामाणिक उद्देश त्या गरुडाचा असतो. परंतु उपकार जाणण्याऐवजी उंदराची पिल्लेच गरुडाचे पंख कुरतडतात व गरुडाचा जायबंदी करतात. असेच काहीसे एक कारण मतदार व्यक्त करतात. त्यामुळे पुढील काळात अशी पिलावळ दूर ठेवणे गरजेचे राहील. कारण २०१९ नंतरच्या काळात मात्र आढळरावांकडे अशी जाणकार माणसे राहिली नसावीत किंवा नंतरच्या काळात जवळ आलेल्या पिलावळीला तपासून घेण्यात आढळरावांनी लक्ष दिले नसावे.
मतदार संघातील असंख्य मतदारांनी व कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हेही सांगितले की, “दादा” तुमच्यावर अनेकांचे प्रचंड प्रेम आहे. प्रचंड विश्वास आहे. तुम्हीच समाजाचा व सर्वसामान्यांचा आधार आहात. या मतदार संघातील लाखो कार्यकते व मतदार तुमचे अजूनही तुमच्याकडे मोठ्या आशेने पहात आहेत.त्यामुळे निवडणुकीत अपयश आले म्हणजे खचून जायचे नाही. तर पुन्हा नव्या जोमाने नव्या उमेदीने “फिनिक्स” पक्षांसारखी झेप घ्यावयाची आहे.
महाभारतात भगवान श्री कृष्णांनी सांगितले आहे की “परिवर्तन ही संसार का नियम है।” त्यामुळे मागील काळात या अगोदर झालेल्या चुकांचे चिंतन करा व त्या चुका परत होणार नाहीत याची काळजी घ्या व कामाला लागा शेवटी विजय आपलाच असेल, असे म्हटले जाते की, “निश्चय ठाम असेल तर, समस्त ब्रह्मांड साथ देते.” त्यामुळे आपले ध्येय गाठण्यासाठीचे सातत्य नियमित असायलाच हवे, यश नक्कीच आपले आहे.