शेतीशिवार
शेती व्यवसायाला, उद्योगाचे प्रगल्भ स्वरूप देणारा प्रतिभावंत “शेती उद्योजक”
वळती दि. (विलास भोर यांजकडून) बिकट परिस्थितीतुन वाट काढत शेतीव्यावसाय करीत, स्वतः ची चाळीस व इतर तीस एकर शेती खंडाने घेऊन, आपल्या कुटुंबातील सर्व सभासदाना एकत्रित करून जिद्दीने, शेती व्यवसायात यशस्वी होण्याचे ध्येय उराशी बाळगत शेती व्यवसाय नव्हे तर शेती उद्योग उभा करणारा “मराठमोळा” सर्वसामान्य युवक शेती उद्योजक बनला हे नव्या पिढीतील शेतकरी युवकांना मार्गदर्शक ठरणारी यशोगाथा म्हणावी लागेल.
“बाजारातील परिस्थितीचा नियमित अभ्यास, त्याचबरोबर योग्य नियोजन आणि प्रमाणिक पणे श्रम केल्यास शेती व्यवसा्यातही प्रगती करता येते “असे मत प्रगतशील शेतकरी धोंडिभाऊ भोर यांनी व्यक्त केले.
दरम्यान आज शेती व्यवसायात प्रचंड तोटा होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत. बाजारभाव नसल्याने शेती व्यवसाय परवडत नाही. अशी ओरड कायमच सर्वत्र ऐकावायास मिळते परंतु आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एका युवकाने पंचवीस वर्षापूर्वी दुसऱ्या एका शेतकऱ्याची दोन एकर शेती खंडाने (अर्धलिन) घेऊन शेती व्यवसाय केला. आज पंचवीस वर्षानंतर हाच युवक एक प्रगतशील शेतकरी म्हणून उदयास आला असून प्रमाणिक कष्ठ, बाजारपेठेविषयचा अभ्यास व सुयोग्य नियोजन यामुळे आज भोर यांनी स्वतः ची चाळीस एकर जमीन खरेदी केली असून सुमारे तीस एकर जमीन, गाव व परिसरातील इतर शेतकऱ्याकडून खंडाने घेऊन शेती व्यवसाय नव्हे तर एक छोटीशी “शेती इंडस्ट्री” सुरु आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
त्याचप्रमाणे मराठी माणूस व्यवसायात मागे असल्याची अनेकवेळा तक्रार अनेक जण करतात. परंतु अनेकजण कोणत्याही व्यवसायाची सखोल माहिती न घेता व्यवसायात उडी घेतात व नंतर व्यवसायात आलेल्या चड उतारा मुळे वैफल्य ग्रस्त होऊन व्यवसाय बंद करतात. पण कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी नीट लक्षात घेऊन तसेच बाजारपेठची मागणी व पुरवठ्याचे व्यवस्थित धोरण लक्षात घेऊन कोणताही व्यवसाय केला तर तो नक्की यशस्वी होतो.आज शेती व्यवसाय होऊ शकत नाही. कारण शेतीत काहीच परवडत नाही असे म्हणणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी, शेती व्यवसायात प्रचंड प्रगती करणारे धोंडीभाऊ भोर हे त्याचे सक्षम व योग्य उदाहरण आहेत असे म्हणावयास हरकत नाही.
दरम्यान भोर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि, आपल्या घरातील सदस्य यांना विश्वासात घेऊन योग्य व आखनी करून त्यासोबत बाजार पेठेतील योग्य ज्ञान, पीक नियोजनाचा अभ्यास व व्यवस्थित नियोजन केल्यास शेती व्यवसाय हा तोट्यात जाऊ शकत नाही. भोर हे सत्तर एकर शेती करत असून त्यापैकी त्यांच्याकडे आजही तीस एकर शेती खंडाने आहे. या शेतीसाठी त्यांनी दोन एकरामध्ये शेततळे निर्माण केले असून नदीवरून पाईप लाईन करून तळ्यात पाणी आणून सोडले आहे.एखाद्या उद्योजकला लाजवील असा स्वतः चा सर्व सुखसोयी युक्त बंगला, घरासमोर विविध उच्च श्रेणीच्या गाड्या, हे सर्व निर्माण केले ते फक्त शेती व्यवसायातून, अनेकांच्या डोळ्यांत अंजन भरणारी हि भोर यांची कामगिरी आहे. त्यामुळे शेतीकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास शेती उद्योगात कोणतीही व्यक्ती गरुडझेप घेऊ शकतो हेच भोर यांच्या या कर्तृत्वातून दिसून येते.
दरम्यान शेती उदयोग सुरु करताना त्यांना साथ मिळाली ती त्यांचे बंधू मोतीराम भोर यांची, दोन भावांनी एकत्रित विचार करून हे यशाचे ध्येय गाठले. आजही यांच्या या उद्योगात घरातील दहा सदस्य एकजुटीने पडेल ते काम करतात रोजंदारीने मानसे मिळोत अथवा न मिळोत आपला व्यवसाय प्रगती पथावर नेण्यासाठी कुटुंबा तील सर्व सदस्य अहोरात्र एकजूटीनेच काम करतात. आपलें पूर्वज एकत्रित कुटुंबं असावे याकरिता का? प्रयत्नशील राहत हे यातून दिसून येते. ज्या घरात एकत्रित कुटुंबं पद्धती आहे अशा घराचा उत्कर्ष झपाट्याने होतो हे देखील पुढील पिढीला एक शिकवण या कुटुंबाकडून मिळते असे म्हणवायास हरकत नाही.