सामाजिक
कथाकथित पुढारी व काही संघटनांचे स्वार्थी पदाधिकारयांमुळे आंबेगावाच्या अर्थकरणाला बसतेय खिळ…
मंचर दि. (प्रतिनिधी ) सध्या आंबेगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या संस्थावर काही राजकीय व्यक्ती अथवा काथा कथित संघटना अनअकलनीय बेछुट आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आरोप किती? खरे, किती? खोटे यापेक्षा या आरोपांमुळे, तालुक्यातील संस्थांच्या नावाला बट्टा लावून राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्याचा घाणेरडा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.
म्हणतात ना… युद्धात व राजकारणात सर्व काही माफ असते हे जरी खरे असले तरी, कोणतेही युद्ध किंवा राजकारण नीतिमत्तेला धरूनच खेळले जावे अशी शिकवण या भारत वर्षात या अगोदर झालेल्या संत महापुरुषांनी दिली. देव व दैत्य कुळापासुन देव दानवांचे वैर होते परंतु ती युद्धे सुद्धा नितीने खेळली गेली अशी पूरानांमध्ये अनेक उदाहरणे आहेत.
सध्या राज्यात विधान सभा निवडणुकींचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीचा धुराला उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांची शक्तीस्थळे निकामी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. सत्ताधाऱ्यांची शक्तीस्थळे म्हणजे तालुक्यातील विविध संथा होत आंबेगाव तालुक्यात बँक पतसंस्था दूध उद्योग, शेतीप्रक्रिया उद्योग शौक्षणिक संस्था तसेच आदी विविध कंपन्या काम करीत आहेत. यावर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असले तरी यांच्यावर बेछुट आरोप करणे गैरच आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
जुन्या पिढीतील अनेक व्यक्तींनी तालुक्याच्या उन्नतीसाठी या संस्थाची स्थापना केली. परंतु आज या संस्थाच्या माध्यमातून तालुक्यातील अर्थकारण मोठ्या प्रमानावर सुरु आहे आज आंबेगाव तालुक्यातील शेकडो सुशिक्षित तरुण व त्यांची कुटुंबे या संस्थावर अवलंबून आहेत. कदाचित यासंस्था तालुक्यात कार्यरत नसत्या तर या तालुक्याची स्थिती एखाद्या उजाड माळराणापेक्षा वेगळी नसती. तालुक्यात शेती व्यतिरिक्त दुसरे कोणतेही रोजंदारीचे साधन उपलब्ध नसते. आपल्या जवळच्या तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागले असतें ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही. असे असताना या संस्थाबाबत असलेली आपली लढाई न्यायालय अथवा शासन दरबारी लढण्याऐवजी कसलाही विचार ना करता या संस्थाच्या कामाविषयी त्यांच्या क्षमते विषयी व्यवस्थित शहानिषा न करता आरोप केले जातं आहेत या तालुक्याच्या दृष्टीने योग्य नाही अशी चर्चा सर्वत्र असून या बाबत कानोसा घेऊन कोणत्याही राजकारण्याने विचार पूर्वक पाऊले उचलणे गरजेचे आहे.
दरम्यान राज्यातील काही नेते तालुक्यातील कथाकथित पुढारी व काही संघटनाच्या स्वार्थी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या संस्थावर जाहीर चिखल फेक करीत आहेत यातून या संस्थावर त्याचा परिणाम होऊन त्याने तालुक्याच्या अर्थाकरणाचे नुकसान होत आहे. याची कदाचित त्या कथाकथित पुढारी व संघटनाच्या लालची पदाधिकाऱ्यांना नसावी. निवडणुका आल्या कि जातं धर्म पंथ आदि विषयांवर राजकारण करणारे राजकीय नेते जर तालुक्यातील संस्थांनाच्या मुळावर घाव घालत असतील व या चाललेल्या बेबंद शाहिला जर त्या संस्थामधील काम करणारा व्यक्ती मुकुटने सहन करीत असेल तर तो काम करणारा व त्या संस्थेवर अवलंबून असणारा कर्मचारी खाल्लेल्या ताटात घाण करतो आहे असे म्हणणे वावागे ठरणार नाही. जी शेतजमीन आपणाला अन्न देते तिला आपण आईचा दर्जा देतो. मग ज्या संस्थेच्या जीवावर आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह चालतो तिच्या प्रति आपली काही जबाबदारी नाही का? याचा विचार होणे आवश्यक् आहे. व तो तालुक्यातील प्रत्येक नागरिकांने करावायाची गरज आहे.