राजकीय
“ना इलाजास्तव निवडणूक लढवावी लागत आहे” या वळसे पाटलांच्या वक्तव्याने, अनेकांना पडू लागली ,”आमदारकीची रुपेरी स्वप्ने”
मंचर दि (प्रतिनिधी )उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंचर (ता आंबेगाव) येथे जनसन्मान यात्रेनिमित्त झालेल्या सभेला संबोधित करताना, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले कि “माझी मुलगी निवडणूक लढाविण्यासाठी तयार नाही,त्यामुळे नाईलाजास्तव मी निवडणूक लढवत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना(शिंदे गटाचे) राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सचिन बांगर म्हणाले कि ,नाईलास्तव निवडणूक लढाविण्यापेक्षा वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यात शिवसेना उमेदवाराला पाठींबा द्यावा व तशी मागणीही बांगर यांनी पक्षाकडे केली असल्याचे सांगितले.
दरम्यान वळसे पाटलांच्या या विधानाचा आधार घेत शिवसेना (शिंदे गट) चे सचिन बांगर म्हणाले, कि, वळसे पाटील हे मोठे नेते आहेत परंतु ते जर नाईलाजास्तव निवडणूक लढाविणार असतील? तर त्यांनी उभे राहण्यापेक्षा आंबेगाव विधानसभेची जागा शिवसेनेला (शिंदे गट) दयावी, कारण, गेली अनेक वर्ष शिवसेना पक्ष या ठीकाणी विरोधात लढत असून शिवसेनेचे स्वतः चे सुमारे साठ ते पासष्ठ हजार मतदान आहे. त्यामुळे वळसे पाटलांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनाचा(शिंदे गट) उमेदवार येथे नक्की विजयी होईल.असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.
“तालुक्यात शिवसेनेची ताकद”ठाकरेंची कि शिंदेची?”
दरम्यान बांगर यांनी केलेल्या विधाणामुळे तालुक्यात राजकीय क्षेत्रात नवीनच समीकरणे तयार झाली आहेत यातच एक महत्वाचे म्हणजे, जर तालुक्यात साठ हजार मते शिवसेना (शिंदे गट) यांकडे असल्याचे जे बांगर यांनी म्हटले आहे. तर मग शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुक्यात काहीच स्थान नाही का? असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे नागरिकांनातून चर्चेला उधान आले आहे. तर शिवसेना (उबाठा गट)चे जिल्हाप्रमुख यांच्या सह काही पदाधिकारी हे देखील शिवसेनेची(उबाठा गट) तालुक्यात साठ हजार पेक्षा जास्त मतदान असल्याचे वारंवार अनेक ठिकाणी जाहीर सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिक नक्की कोणत्या गटाकडे आहे. या बाबत चर्चेला उधान आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर देखील मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. वळसे पाटलांच्या या विधानामुळे महायुतीतील सर्वच पक्षांचे उमेदवार मैदाणात आपलें नशीब आजमावण्यासाठी उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जातं आहे.तसेच भाजपा कडून संजय थोरात, यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे.
गेली पस्तीस वर्षे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रचंड बहुमताने आंबेगाव विधान सभा मतदार संघातून मोठ्या फरकाने विजयी होत आहेत. वळसे पाठलानी तालुक्याच्या राजकारणात केलेली संघटना बांधणी इतकी मजबूत आहे कि, वळसे पाटलांचा सहजा सहजी पराभव करणे दुरास्पद आहे. परंतु वळसे पाटलानी जेव्हा देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्यापासुन फारकत घेतली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ दिल्यानंतर तालुक्यातील शरद पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या जुन्या पिढीच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या रोषाला वळसे पाटलांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर शरद पवार यांना भीमाशंकर सह. साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष यांनी तालुक्यात साथ दिली. मागील लोकसभा निवडणुकीत निकम यांनी तालुक्यात खासदार कोल्हे यांना आघाडी मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले असल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी वळसे पाटलांना निकम हे चांगली फाईट देऊ शकतात असे काहींचे मत आहे परंतु सत्तेच्या राजकारणात कोणाचे प्यादे केंवा वरचढ होईल हे सांगता येत नाही.
दरम्यान शिरूर लोकसभा निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास विजयी उमेदवारापेक्षा कमी मते मिळाली त्यामुळे सर्वच पक्षातील अनेक नेत्यांना तालुक्यात विरोधी मतांचा टक्का वाढल्याची चर्चा सुरु असून त्यातच वळसे पाटलांच्या या वक्तव्यामुळे अनेक जण या स्पर्धेत उतरले आहेत यात काहींनी साधी ग्रामपंचायतची निवडणूक देखील लढाविलेली नाही त्याचप्रमाणे मतदा्रांमध्ये कसलीच विश्वासाहर्ता मिळवू न शकलेले स्वयंघोषित नेते आता आपण आमदार झालोच अशा अविर्भावात फिरत असल्याचे दिसत आहेत .
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
August 23, 2024 at 3:43 pm
येणाऱ्या विधानसभेत आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व कोण करील . हे आज जरी सांगता येत नसलं तरी एक मात्र शंभर टक्के खरं आहे आंबेगाव तालुक्याच्या नेतृत्वात बदल होणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे . आणि तो नक्की घडणार यात काही शंका नाही .