सामाजिक
“विकास कामे हि जनतेच्या विकासासाठी” कि,लाभार्थी ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी व लाचखोर कथाकथित पुढारी यांची पोटभरण्यासाठी?
मंचर दि (प्रतिनिधी) लाभार्थी ठेकेदारांनाची पोटं भरण्याकरिता माय बाप जनतेने जी एस टी किंवा इन्कम टॅक्स च्या माध्यमातून राष्ट्र उभारणी साठी दिलेल्या पैशाचा लुटारू शासनकर्ते व प्रशासनाच्या माध्यमातून प्रचंड प्रमानावर लूट चालली आहे हि लूट थांबविण्याकरिता कदाचित सर्व सामान्यांनाना आपल्या हाती कायदा घेण्याची गरज पुढील काळात येऊ नये एव्हढेच….
दररोज कुठेना… कुठे विकासच्या नावाखाली चाललेली विकासाची बहुतांशी कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाची होत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विकास कामासाठी राज्यकर्ते निधी टाकतात कि आपल्या तालुक्यातील काही लाभार्थी ठेकेदारांची व त्यासोबत प्रशासकीय अधिकारी व कथाकथित पुढऱ्यांच्या विकासासाठी हे काही कळत नाही.राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबत असणारे मंत्रिमंडळ राज्याच्या विकासाचा दावा करीत आहे. परंतु खरंच सुरु असलेल्या कामाचा दर्जा चांगला आहे का? या नित्कृष्ठ दरज्याच्या कामांना जबाबदारी कोण? हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.
आज राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावांत सुरु असलेली कामे हि अतिशय नित्कृष्ठ दर्ज्याची सुरु आहेत. सर्वच ठिकाणी सुरु असलेल्या कामाचा दर्जा हा देश अथवा राज्य सक्षम बनविण्यासाठी नसून स्थानिक लाभार्थी कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी व कथाकथित लाचखोर पुढाऱ्यांची पोटं भरण्यासाठी चाललेला उतात्याप असल्याचे दिसत आहे. अशी चर्चा सर्वत्र जनतेमध्ये सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्यात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची दुरावस्था पाहून अनेकांच्या मुठी नक्क्कीच वळल्या असतील यात शंका नाही व नाजिकच्या काळात या वळलेल्या मुठीनी या भ्रष्ट यंत्रणेला सुधारविण्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये इतकेच….
राज्यकर्ते जाहीर सभांतून कामासाठी एव्हढ्या कोटींचा निधी त्या विकास कामासाठी, तेव्हढ्या कोटींचा निधी दिल्याच्या वलग्ना करीत आहेत. परंतु हा निधी खरंचच जनतेच्या जनतेच्या विकासासाठी योग्य रीतीने वापरला जातो का? कि, आपल्या आवातीभोंवती खोटेनाटे गोडावे गात फिरणाऱ्या लाभार्थी ठेकेदारांच्या विकासासाठी, याचे आत्मपरीक्षण राज्यकर्त्यांने करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात या विकास कामाच्या धिगाऱ्याखाली जनता या लाभार्थी ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत राज्याकर्त्यांना गाडल्या शिवाय राहणार नाही अशी स्थिती सर्वत्र निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
सध्या आपण जगत असलेल्या स्वातंत्र्यापेक्षा इंग्रजसत्ता बरी होती अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. असे म्हणण्यापेक्षा काही लोक तर हि प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. याचाच अर्थ या पराकोटीच्या भ्रष्ट व्यवस्थेला सुधारविण्यासाठी व पुन्हा नव्याने या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या छाताडावर नाचण्यासाठी व स्वतंत्र व सक्षम भारत उभा करण्यासाठी पुन्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, टिळक, गांधी,चाफेकर बंधू या सारख्या स्वतंत्र सैनिकांना या भारत भूमीत जन्म घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजा महागाई, बेरोजगारी, भाष्टाचार, स्त्रीयांवर होणारे आत्याचाराचे स्वरूप पहाता पुन्हा देश या स्वार्थी सत्ताधाऱ्यांमुळे परतंत्र्यात जातं असल्याची भावना सर्वासामान्य जनता आज कुठेना कुठे व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात साठत चाललेल्या या ज्वाला मुखीचा उद्रेक होणे केव्हा तरी नक्कीच होईल कारण जनतेचा मनावर होणारे हे अधाद पहाता पुन्हा देशात सुरु झालेल्या या काळरात्रीचा नायनाट करून सक्षम भारताची उष:काल करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला पुढे यावे लागणार असून हि स्थिती नाजिकच्या काळात लकवकरच उभी राहील यात शंका वाटत नाही
अशोक मोढवे
August 26, 2024 at 2:35 pm
रोख ठोक भूमिका मांडली हे असं चालणार आंधळदळतंय कुत्र पीठ खातय खरंच इग्रजांचा राज्य चांगलं होतं
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
August 26, 2024 at 3:15 pm
अतिशय छान असं विश्लेषण आपण केलं . विकासाच्या नावाखाली जो काय भ्रष्टाचार चालू आहे . आणि लाभार्थ्यांचे पोट भरण्यासाठी विकस निधी वाटला जातोय .याबद्दल आपण रोखठोक भूमिका मांडली . त्याबद्दल आपले मनापासून मनसे अभिनंदन . असच लिखाण पुढे चालू राहू द्या .माझ्या आपणास मनःपूर्वक मनसे शुभेच्छा .
Nilkanth Suresh Kale
August 26, 2024 at 6:30 pm
छान शब्द लेखन
Bobhata News
August 28, 2024 at 7:48 am
Thanks
Nilkanth Suresh Kale
August 26, 2024 at 6:31 pm
रोख ठोक भूमिका