राजकीय

भीमाशंकर कारखाण्याच्या सभेत अतिउत्साही कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे “सत्ताधाऱ्यांचे डॅमेज कंट्रोल”भरून निघणार का?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यात राजकारणाने एक वेगळेच  विपरीत वळण घेताना दिसत आहे म्हणतात ना… ” जो बुंद से गई वह हौद से नही आती”, आता तर “हौद से गई है वह  बुंद कैसे आयेगी?” अशी स्थिती सत्ताधाऱ्यांची झाली कारण भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत घडलेला प्रकार हा  खूपच लांच्छनापद घडला असून, तालुक्याच्या इतिहासात नको तेव्हडी आब्रू सत्ताधाऱ्यांनी घालविली असल्याचे दिसून आले आहे.

तालुक्याच्या गावागावात वाडी वस्तीवर नाक्यानांक्यावर भीमाशंकर  कारखाण्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान  घडलेला  प्रकार हा प्रचंड वाईट असून त्यावर सर्वसामान्य जनतेतून विविध  प्रतिक्रिया उमटत आहेत. खरंतर असे घडायला नको होते. परंतु हा प्रकार घडणे म्हणजे पराभव पुढे दिसू लागल्याने सत्ताधाऱ्यांनाचा तोल सुटत चालल्याची चर्चा जनतेतून ऐकावायास मिळत आहे. असून या माध्यमातून आंबेगा्व  तालुक्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातं का? अशीही चर्चा सर्वत्र सुरु आहे. परंतु वळसे पाटील अशा विद्रोही वृत्तीना स्थान देत नाहीत. हा अतिउत्साही कार्यकर्त्यांनी “साहेब,” मी आपला खूप निष्ठावंत कार्यकर्ता आहे हे दाखविण्यासाठी केलेला प्रयोग आहे. कारण नाजिकच्या काळात कारखाना किंवा मार्केट कमेटी अथवा बँक या ठिकाणी वर्णी लागण्यासाठी आपण साहेबांचे किती पाईक आहोत हे दाखविण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न होता. अशीही चर्चा सर्वत्र सुरु आहे.

 आज पर्यंत जे तालुक्यात राजकारण झाले त्यात तात्कालीन खासदार व विद्यमान आमदार स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी विरोधी उमेदवार देत होते. कारण तालुक्याच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री यांच्या समोर भर सभेत सध्याच्या माजी. खासदारांच्या प्रवेशाचे वेळी म्हटले होते कि, “तुम्हांला आमदारकीला अनेक उमेदवार आम्ही दिले” याचा अर्थच असा कि तालुक्यातील  विरोधकांना कुठल्यातरी आर्थिक अथवा राजकीय  कोंडीत पकडून त्या पद्धतशीर वापर गेल्या काळात केला गेला असावा अशी चर्चा जनतेत सुरआहे.

परंतु राज्याच्या राजकारणात आपल्याच राजकीय गुरूं समवेत फारकत घेतलेल्या तालुक्याच्या आमदारांना मात्र शरद पवार यांना सोडून जाणे महागात पडत असल्याचे दिसत आहे. जरी आमदारानीं डिंभे धरणाचे  पाणी पळवून नेण्याचे  कारण पुढे केले असले तरी हे कारण काही केल्या जनतेला पटलेले दिसत नाही.तसेच तालुक्यात  शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही तालुक्यात आहे.

दरम्यान  कारखाण्याच्या सर्वसाधारण सभेत झालेला  गोंधळ वळसे पाटलांच्या समोर झाला.व वळसे पाटील या गोंधळाला हताळण्यात कमी कसे? पडले, एव्हढ्या सक्षम नेतृत्वासमोर हा गोंधळ झालाच कसा? म्हणजेच कार्यकर्त्यांनी केलेला हा गोंधळ कुणाच्यातरी पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. हा गोंधळ पूर्व नियोजित होता का? कि आपणच कसे खरे साहेब निष्ठ आहोत हे दाखविण्याच्या कार्यकर्त्यांच्या स्पर्धेमध्ये हा प्रकार घडला याबाबत  अनेक  प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.  वळसे पाटलांच्या समोर झालेला हा प्रकार खूपच वाईट असून, गुंडागिरी करून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात असल्याची चर्चा सुरु असून निकम यांच्या विरोधात झालेला हा गोंधळामुळे  मात्र विरीधकांना प्रचंड प्रमाणावर सहानुभूती मिळत असल्याचे दिसत आहे.

  “डॅमेज कंट्रोल साठी  महिला कार्यकर्त्यां मैदानात ”

कारखाण्याच्या गोंधळानंतर आता तालुक्यातकाही  महिला कार्यकर्त्यांची फळी उभी करून निकम यांच्यावर प्रहार करून सहानुभूती मिळविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. अनेक महिला कार्यकर्त्या मार्फत प्रतिक्रिया देऊन झालेले डॅमेज कण्ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण या सर्व महिला कार्यकर्त्या किंवा त्यांचे नातेवाईक कुठल्याना कुठल्या तरी लाभाच्या पदावर कार्यरत असल्यामुळे याचा डॅमेज कंट्रोलसाठी काही उपयोग होणार नाही असे बोलले जातं आहे. म्हणून म्हणतात ना… “हौद से गई ओ बुंद वापीस कैसे आयेगी?”

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 12, 2024 at 6:28 am

    तत्कालीन खासदारांनी यांना विधानसभेला उमेदवार पुरवले . याचा अर्थ हे दोघेही पुर्वीपासूनच एकत्र होते .यांनी मोठे साहेबांची साथ सोडली तर हे बरोबर ? आणि यांची साथ कार्यकर्त्यांनी सोडली तर ही चूक हे कसे काय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version