गावागावातुन

“गुड्डी” नामक कुत्री मुळे बिबट्याच्या हल्ल्यातून  वाचले शेतकऱ्याचे “प्राण”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)”म्हणतात ना.. कुत्रा हा सर्वात प्रामाणिक व इनामदार प्राणी आहे.या वाक्याचा प्रत्यय काल लाखगाव (ता आंबेगाव) येथील  एका  शेतकऱ्याला आला.येथील  “गुड्डी” नावाच्या कुत्रीच्या सावधानतेमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून हनुमंत टाके शेतकऱ्यांचे प्राण वाचले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि  आंबेगाव तालुक्यातील लाखगाव येथील गव्हाळीमळा या वस्तीवर राहणारे हनुमंत नारायण टाके (वय ४२ वर्षे) हे शेतकरी  पहाटे चार वाजताच्या सुमारास लघुशंख्येसाठी घराबाहेर आले होते यावेळी त्यांच्या सोबत त्यांची गुड्डी नावाची कुत्री देखील होती. या वेळी या परिसरात सावजासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकरी हनुमंत टाके यांच्या अंगावर झेप घेतली व त्यांच्या मानेला धरण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी यांच्या सावधनतेमुळे बिबटयाने माने ऐवजी शेतकरी यांचा दंड पकडला. यात शेतकरी खाली जमिनीवर पडले 

दरम्यान बिबट्यासोबत  झालेल्या्  झटापटीत  बिबट्याच्या जबड्यातून  शेतकरी टाके यांचा हात सुटला. तद नंतर बिबट्याने पुन्हा शेतकरी हनुमंत टाके यांच्या  पायाला पकडून ओढुन नेण्यास सुरुवात केली असता जवळच असलेली त्यांची पाळीव कुत्री  “गुड्डी” हिने जीवाची तमाम न बाळगता बिबट्यावर हल्ला करून बिबट्याला चावा घेऊन ओढण्यास सुरुवात केली. याच वेळी शेतकरी यांची पत्नी हिने दरवाज्यातून तर घरातील लहान मुलांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केल्याने बिबट्या तेथून पसार झाला. अशा प्रकारे मृत्युच्या दाढेतून “गुड्डी” नावाच्या या कुत्रीने आपल्या मालकाचे “प्राण” वाचऊन, या प्राण्याने “कुत्रा” च खरा इनामी प्राणी असल्याचे पुन्हा सिद्ध केले.

गेल्या काही वर्षापासुन जुन्नर वन परीक्षेत्रात बिबट्यांची संख्या सातात्याने वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या सर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. साधारण पणे जंगलात जर एखाद्या प्राण्याने अनेक पिलांना जन्म दिल्या नंतर त्यातील अनेक पिले काहीना काही करणास्तव जगत नाहीत.

परंतु  उसाच्या शेतात या पिलांना बिबट्याने जन्म दिल्या नंतर त्यांची सर्वच्या सर्व पिले जगतात त्यामुळे त्यांची जनन प्रमाण वाढले आहे. यामुळे थोड्याच कालावधित बिबट्याची संख्या वाढत चालली आहे. परंतु त्याच प्रमाणात त्यांच्या भक्षकांची संख्या झापाट्याने कामीही होत आहे त्यामुळे बिबट्यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तसेच मानवी हल्ले रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version