राजकीय

अंकुशराव लांडगे यांच्या कार्याचा, नव्याने आलेल्या आयारामांना विसर पडला का?  म्हणूनच लांडगे कुटुंबावर झाला भाजपाकडून अन्याय…..

Published

on

पुणे दि (नेहे पाटील ) भोसरी क्षेत्रात भाजपाच्या रोपटयाचा वटवृक्ष करण्यासाठी अहिरात्र झगडणाऱ्या कै. अंकुशराव लांडगे यांच्या कार्याचा आताच्या आयारामांना विसर पडला आहे का? त्यामुळेच लांडगे कुटुंबावर भाजपा कडून अन्याय झाला अशी चर्चा या मतदार संघात सर्वत्र सुरु आहे. 

 गेल्या पाच दशकापूर्वी  कै. अंकुशराव  व त्यांचे बंधू बाबासाहेब लांडगे यांनी कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे  रोपटे लावले होते. आज मात्र  त्या  रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.  पक्षवाढीसाठी सातात्याने सामाज कार्यात झोकून देणाऱ्या कै. बाबासाहेब व अंकुशराव यांचे निधन झाले. त्या नंतर देखील  कुटूंबातील श्रीमती आशाताई  व रवि लांडगे यांनी आपल्या कुटुंबावर होणारा अन्याय बाजुला  ठेऊन समाज सेवेसाठी सेवेसाठी व पक्ष वाढीसाठी स्वतः ला पक्ष कार्यात झोकून दिले. व समाजाची सेवा अविरत पणे सुरूच ठेवली. पण पक्षाला त्यांच्या समर्पणाची जाणीव झालीच नसावी. म्हणूनच कि काय?स्वतः च्या  उत्कर्षांत मुशगुल असलेल्या  भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वा ने या कुटूंबाला संधी देण्याचे टाळून या कुटुंबावर अन्यायचं केला असल्याची प्रतीक्रिया अनेक भा ज पा चे कार्यकर्ते खाजगीत देत आहेत.

  दरम्यान  वारंवार पक्ष नेतृत्वाकडून विविध पदावर संधी देण्याऐवजी लांडगे कुटुंबाला सातात्याने डावलले गेले तरी हि कै.अंकुशराव लांडगेचा वारसा जपत  रवि लांडगे व त्यांचे कुटूंब भा. ज. पा. सोबतच राहिले. परंतु शेवटी भाजपा तील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही त्यांची हि वारंवार होत असलेली गळचेपी पहावत नव्हती व एकत्रित पणे दुसरा रस्ता निवडण्यासाठी वारंवार विनंती केली. परंतु लांडगे कुटुंबाने पक्ष निष्ठा हि महत्वाची म्हणत कार्यकर्त्यांना समजावण्याचा वारंवात प्रयत्न देखील केला. परंतु तरीही सातात्याने रवि लांडगे व त्यांच्या कार्यकर्त्यां वर स्थानिक भा ज पा नेतृत्वा कडून सातात्याने अन्याय  होत गेला.  या अन्यायविरोधात  कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर व जनते होणाऱ्या मागणी नुसार  रवि लांडगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला.भाजपा कडून आपणाला आपल्याला न्याय मिळत नाही. म्हणुनच  रवि लांडगे व त्यांच्या  कार्यकर्त्यांनी एकत्रित विचार करून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला असून त्यास  सर्वसामान्य जनतेकडून हि  रवी लांडगे यांना भरभरून प्रतिसाद मिळाला .

  आगामी काळात भोसरी विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा भगवा फडकेल अशी चर्चा मतदाराकांकडून ऐकवायास मिळत असल्याने हि निवडणूक खूपच रंजक व परिवर्तन शील होणार अशी चर्चा सर्वत्र आहे.

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 20, 2024 at 11:31 am

    संपूर्ण भाजप कॉग्रेसवासी झाली आहे . त्यामुळे निष्ठावंतांना न्याय मिळणार कसा ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version