राजकीय
“भीमाशंकर व विघ्नहर” कारखान्यांनी गोळा केलेल्या शेअर्सच्या रक्कमेसंदर्भात ठोस भूमिका घेणार असल्याची, साखर आयुक्तांची ग्वाही -जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर
मंचर दि. (प्रतिनिधी)भीमाशंकर व विघ्नहर या दोन्ही साखर कारखान्यांकडे त्यांच्या कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शेअर्स अनामत रक्कम पडून असूनहि या शेतकऱ्यांना अजूनही सभासद करण्यात आलेले नाही. त्यासर्वांना तातडीने सभासदत्व द्यावे अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्ताकडे केली असल्याची माहिती शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली.
गेली अनेक वर्ष साखर कारखान्याकडे शेअर्स रक्कम पडून आहे अनेक वर्षा पासून या शेतकऱ्यांना सभासद करतो म्हणून सांगितले जातं आहे. परंतु अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यात आले नाही. तसेच त्यांना कायद्यातील काय? तरतूद आहे. हे देखील समजावून सांगण्यात आले नाही. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणे योग्य नसून त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे असा आग्रह प्रभाकर बांगर यांनी साखर आयुक्तांकडे धरला.
या संदर्भात आपणाकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा जो प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहे. त्यावर स्पष्टपणाने भूमिका घेऊन त्या संदर्भात आपण तसे कारखाना प्रशासनाला कळवावे असाही आग्रह साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे बांगर यांनी धरला होता. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर ही सर्व चर्चा झाली. त्यावेळी साखर आयुक्तांनी याबाबत लवकरात लवकर ठोस भूमिका घेतली जाईल असे आश्वासन प्रभाकर बांगर यांना दिले.