राजकीय
“आंबेगावच्या विरोधी मतदानात फूट पाडण्यासाठी कोण खेळतंय का?राजकीय चाल,यासाठी कोण पुरवतंय का? बंडखोर विरोधकांना माल”….
मंचर दि. (प्रतिनिधी )आंबेगाव तालुक्यात आमदारकीच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर कथाकथित उमेदवारांचे पेव फुटले असल्याचे दिसत आहे, कोणतीही सामाजिक अथवा राजकीय पाश्वभूमी नसलेले स्वयंघोषित नेते पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्री प्रमाणे भावी आमदारकीची जाहिरात करीत मतदारांना वेगवेगळी प्रभोलने देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे विरोधकांमध्ये फूट पाडण्याची सत्ताधाऱ्यांची एक चाल आहे अशी चर्चा सद्या तालुक्यात सुरु आहे.
मुंबई पुण्यासारख्या शहरीभागात व्यवसाय थाटून चार पैसे खिशात आलेल्या कोणतीही समाजकारणाची पाश्वभूमी नसलेले कथाकथित स्वयंघोषित नेते पावसाळ्यांत उगवणाऱ्या राण गावाताप्रमाणे सर्वत्र उगवले आहेत. तालुक्यातील काही लाभार्थीना हाताशी धरून हे स्वयंघोषित नेते आमदारकीची भावी स्वप्न पहात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
त्यानिमित्ताने तालुक्यातील नागरिकांना विशेषतः महिलांच्या मतदाणावर डोळा ठेवत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आसून त्यानिमित्ताने विविध देवस्थान दर्शनासाठी मोफत बस सेवा, महिला वर्गाला वाढ दिवसाचे अथवा इतर काहीही धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे औचिय साधत साड्या वाटप करणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीवर भव्य सूट देणे अशा प्रकारच्या विविध ऑफर मोठ्या प्रमाणावर दिल्या जातं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान सत्ताधारी आमदारांना त्यांच्याच कारखान्यावरील माजी अध्यक्ष्यांचे आव्हान जड असल्याची चर्चा सध्या तालुक्यात मोठया प्रमाणावर सुरु आहे. काही दिवसपूर्वी तालुक्यातील कारखाना सभेत झालेल्या गोंधळानंतर सत्ताधाऱ्यांना यांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागले होते.व विरोधकांना त्याचा चांगलाच फायदा झाला होता.त्यामुळे समाज मनात आपली प्रतिमा अनकुल बनविण्यासाठी, व विरोधी पक्षात तिकिटासाठी चाललेली चढाओढ दाखवून विरोधी उमेदवारांची मन भिन्नता चव्हाट्यावर आणून समाज मनात आपली प्रतिमा स्वच्छ व दृढ करण्यासाठी ची रणनीती सत्ताधाऱ्यांकडून आखाली जातं असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळेच या कथाकथित स्वयंघोषित पुढऱ्यांची निर्मिती केली जातं असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील विरोधकांच्या मतांचे विभाजन करणे हाच मूळ सत्ताधाऱ्यांचा राजनैतिक अजंडा दिसत आहे त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या काहींना वेगवेगळ्या प्रकारे रसद पुरवून या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे का? याबाबत चर्चा सुरु आहे. तालुक्यात विरोधकांचे मतदान कमी करण्यासाठी विरोधकांच्या मतांमध्ये मतांतरे केल्यास मत विभागणी होईल.तसेच विरोधी पक्षात चाललेली तिकिटासाठीची रस्सीखेच पहाता मतदार यांना वैतागून पुन्हा सत्ताधाऱ्यांना मतदान करण्याच्या मानसिकतेकडे येईल.यासाठी हि व्युरचना केली जातं असावी असे नागरिकांनातून मत व्यक्त केले जातं आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीला निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झालेला नसला तरीही असे राजकीय फासे टाकून विरोधकांमध्ये भांडणे लावून इंग्रज नीतीचा वापर सत्ताधारी करीत आहेत अशी सर्वत्र चर्चा आहे . परंतु यावर प्रतिक्रिया देताना काही मतदारांनी असे सांगितले कि सध्याची निवडणूक हि फार वेगळी आहे हि निवडणूक जनतेने ताब्यात घेतली आहे व तालुक्याच्या राजकाराणात चाललेले बदल यावर जनता लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे पुढे काय? निर्णय घ्यायचा हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी काहीही फंडे आजमावले तरी जनता मात्र याचे उत्तर योग्य पद्धतीने देईल.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 22, 2024 at 4:40 pm
खरोखर निवडणूक जनतेने हाथी घेतलेली आहे त्याच्यामुळे विरोधकांमध्ये कितीही फूट पाडायचा प्रयत्न केला तरीही सत्ताधारी उमेदवार निवडून येणार नाही याची काळजी आंबेगाव तालुक्यातील जनता नक्कीच घेईल .