सामाजिक

प्रवाशांच्या सुविधेसाठी मंचर येथून पुणे सह आंबेगावात सर्व गावांत, प्रवासासाठी एसटी च्या फेऱ्या वाढवाव्यात – वसंत बाणखेले

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी ) आंबेगाव तालुक्यात एस टी आगार सुरु होऊन सुमारे दोन वर्ष झाली परंतु अद्यापही  विविध गावात एसटी सेवा पूर्णपणे सुरळीत सुरु नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यां, महिला वर्गा सह सर्वच प्रवाशांचे हाल होत असून आगारत एसटी वाहनांची संख्या वाढवावी तसेच पुणे सह तालुक्यातील सर्व गावांमध्ये एसटी च्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी मंचर माजी ग्रा प सदस्य व  समाजिक कार्यकर्ते वसंत बाणखेले यांनी लेखी निवेदना द्वारे केली आहे.

आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर येथे परिवहन महामंडळा कडून एसटी आगार सुरु करण्यात आले आहे. परंतु मंचर शहरासह तालुक्यामध्ये विविध  गावांत एसटी सेवा पूर्णपणे कोलमोडली असल्याचे दिसत आहे. गेले काही महिन्यापासुन अनेक गावांमध्ये दिसणारी लालपरी मात्र आता येतच नसल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. तर काही गावांत एस टी च्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असल्याचे समजते. शासनाने लाडक्या बहिणीसाठी अर्धे तिकीट केले खरे पण त्याच बरोबर एसटी वाहतुक देखील कमी केली असल्याने ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी एसटी परिवहन सेवा कोलमोडली असल्याचे चित्र आहे.

 मंचर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी आगारात एसटी वाहनांची संख्या कमी आहे सद्यास्थितीत मंचर आगारात एसटी  वाहने क्षमतेपेक्षा खूप असल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे  पूर्वभागासह सातगाव पठार तसेच तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागासोबत मंचर येथेही  एसटी वाहनांची असलेल्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांसोबत मंचर येथे शाळा कॉलेज साठी येणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे खूपच हाल होत असून मंचर आगारामार्फत वाहनांचे संख्या वाढवून तालुक्यात एसटी चे  वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी वसंत बाणखेले,मुकुंद खुडे व आंबेगाव तालुका कुंभार संघटना अध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनी केली आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version