सामाजिक

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नसाठी “शेतकरी नेते प्रभाकर बांगर” यांनी सुरु केलेल्या “आमरण उपोषणास” आंबेगावच्या  जनतेकडून वाढता पाठिंबा.!!!

Published

on

मंचर दि.(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंबेगाव तालुका शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर  यांच्या खडकी पिंपळगाव (ता. आंबेगाव)येथे सुरु करण्यात आलेल्या आमरण उपोषणास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून विविध संघटनांनी या उपोषणास पाठींबा दिला आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तालुका शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांच्या यांनी अमरण उपोषणास सर्व स्थरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या आंदोलनास पाठींबा जाहीर दिला असून  खासदार कोल्हे यांचे बंधू विजय कोल्हे यांचे हस्ते प्रभाकर बांगर यांना पाठिंब्याचे पत्र  दिले आहे.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2024/10/1000166156.mp4
                     "जनतेतून नाराजीचा सुरु"
      "गेली आठ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितार्थ सुरु केलेल्या शेतकरी आंदोलन थांबाविण्यासाठी प्रशासन व  शासनाचे प्रतिनिधी म्हणून सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या कडून  अद्यापही योग्य दाखल न घेतल्यामुळे संपूर्ण तालुक्यात नाराजीचा सुरु उमटत आहे".

दरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे १)भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याने यावर्षीच्या म्हणजेच  २०२३/२४ च्या ताळेबंदानुसार  उसाला सद्या दिलेल्या भावात २६३/- रु प्रतिटन आणखी भाव वाढवून द्यावा द्यावा,२) शासनाने दुधाला 3.५/८ .५ प्रतिला ४o/-रुपये प्रती लिटर भाव मिळावा, सरकारने अनुदानाच्या कुबड्या न देता थेट शेतकऱ्यांना वरील भाव जाहीर करावा  तसेच खाद्य कंपन्याचे भाव नियंत्रणात आणावेत कारण त्यामुळे दुधाच्या उत्पादन खर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. सरकारने याबाबत फेरविचार करून निर्णय घ्यावा,

 त्याचप्रमाणे ३)आंबेगाव तालुक्यात म्हाळसाकांत, कळमोडी मंचर जवळील निघोटवाडी येथील पाण्डवदरा धरण,आदिवासी भागातील पाणी प्रश्न मार्गी लावावा,४) आंबेगाव तालुक्यात विकास कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाची होत असून त्या द्वारे होत असलेल्या भ्रष्ठाचाराची चौकशी व्हावी, ५)शेती पंपाना दिवसा विदयुत पुरवठा करावा, ६) उत्तर पुणे जिल्यात  बिबट्या वाघच्या वाढत्या संख्येने अनेक नागरिकांना आपलें प्राण गमवावे लागले आहेत या बाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, आदिवासी भागातील मुख्यपीक हिरडा पिकास हमीभाव मिळावा, 

तसेच ७) विघ्नहर सहकारी साखर कारखाना व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या कार्य क्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या  सभासद अनामत रक्कम घेऊनही सभासदत्व दिले नाही त्यावर त्वरित निर्णय घ्यावा आदी विषयावर शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आमरण उपोषणास नागरिकांनातून प्रचंड पाठीबा मिळत असून या बाबत त्वरित निर्णय घेण्यात यावर अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version