राजकीय
आगामी आंबेगाव विधानसभा निवडणूक, वळसे पाटील यांचेसाठी “अष्टपैलू विजयाची” ठरणार? कि, “अटाअटीची आणि कटकटीची”….?
मंचर दि – (प्रतिनिधी )महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक जाहीर झालेली आहे.. महाराष्ट्रात काय? होणार याबाबत तर उत्सुकता आहेच. त्याचसोबत आंबेगाव विधानसभेची निवडणूक देखील पुढील काळात अतिशय निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही गेली. गेली पस्तीस वर्षे विरोधकांना धूळ चारत आपले एक हाती निर्विवाद वर्चस्व ठेवणारे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या वेळी निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा असून त्यांची हि आठवी वेळ आहे.
गेल्या सात निवडणुकामध्ये वळसे पाटलांनी अनेक दिग्गजांना धूळ चारली आहे.त्यामुळे त्यांचा तालुक्याच्या मतदारांवर असलेला प्रभाव दिसून येतो. तसेच त्यांच्याकडे असलेला कार्यकर्त्यांचा संच त्याचप्रमाणे उत्कृष्ट नियोजन करणारे प्रामाणिक संयोजक, यामुळे वळसे पाटलांचे आंबेगाव विधानसभा मतदार संघावर वर्चस्व दिसून येते याच बरोबर विरोधी पक्षात असणारे अनेक कार्यकर्ते वळसे पाटलांच्या विरोधात ओरडतात असतात. परंतु ऐन निवडणुकीत मात्र यातील काही विरोधी कार्यकर्ते आपल्या उमेदवाराची साथ सोडून वळसे पाटलांच्या तंबूत दाखल होत त्यांचा प्रचार करतात. हि प्रथा आंबेगावांत अनेक वर्षापासुन सुरु आहे.
तसेच या वळसे पाटलांच्या जमेच्या बाजू असल्या तरी वळसे पाटलांपुढे अनेक आव्हाने आहेत. ती विसरून चालणार नाहीत.सर्वात महत्वाचे म्हणजे वळसे पाटलांनी तालुक्यात विकास केला परंतु अनेक ठिकाणी त्या कामांचा दर्जा अतिशय नित्कृष्ट दर्जाचाआहे असे म्हटले जाते यामागचे कारण म्हणजे वळसे पाटलांच्या नावाने काही लाभार्थी ठेकेदारांनी केलेली हि कामे होत. त्यामुळे वळसे पाटलांनी तालुक्यात विविध विकास कामासाठी प्रचंड आणूनही अनेक ठिकाणी “नित्कृष्ठ दर्जाचा भकास विकास” उभा असल्याचे सांगितले जाते.
त्याबरोबर या वेळी वळसे पाटलांना टक्कर देण्यासाठी त्यांचेच शिष्य देवदत्त निकम त्यांच्यापुढे उभे आहेत. निकम यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना सर्व सामान्य शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीने कामे केली आहेत त्याच प्रमाणे तालुक्याच्या सर्व भागात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. लग्न असो कि पूजा, अंत्यविधी असो कि दशक्रिया अशा अनेक ठिकाणी निकम यांनी उपस्थित राहून सर्व सामान्य मतदारांच्या मनात आपलें हक्काचे स्थान निर्माण केले आहे असे म्हटले जाते.
त्याच प्रमाणे गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेली फूट व यात वळसे पाटिल यांनी आपले पितृतुल्य व राजकीय गुरु माजी कृषिमंत्री शरद पवार यांची सोडलेली साथ व त्यातून निर्माण झालेली नाराजी हा मुद्दा प्रचंड त्रासाचा ठरणार आहे आणि दुसरे म्हणजे गेल्या काळात वळसे पाटलांनी तालुक्यातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला करत विविध संस्थावर इतर काही कार्यकर्त्यांची वर्णी लावली त्यामुळे जुन्या अनेक कार्यकर्त्यांनीची मोठी फळी वळसे पाटलांच्या विरोधात सुप्तपणे काम करीत आहे. त्यांना ओळखून आपलेसे करण्याचे वळसे पाटलांपुढे मोठे आव्हान असणार आहे.
त्याबरोबर वळसे पाठलांचे वय हा ही मुद्दा मोठा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी निवडणूक वळसे पाटील यांच्यासाठी अष्टपैलू ठरते कि अटाअटीची वआणि कटकटीची हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
October 20, 2024 at 2:03 am
खरं तर वळसे पाटलांनी आता थांबलं पाहिजे . वय पण झालंय आणी शरीरही साथ देत नाही . वय आणी शरीर याच विषयावर अजितदादांनी शरद पवारांचा पक्ष ताब्यात घेतला . झालेला विकास हा जनतेसाठी किती आणी लाभार्थ्यासाठी किती याचाही विचार झाला पाहिजे . ३५ ते ४० वर्षे झाली तरी सर्व सत्ता आपल्याकडेच पाहिजे . हा अट्टहास का ? त्यामुळे हि निवडणूक अटीतटीची नसुन कायमची कटकट नको . म्हणून लोक निवडणूकीत मतदान करतील .