राजकीय
“पवार साहेबांबद्द्ल आजही मनात प्रेम व आदर”,: सत्तेत सहभागी झालो म्हणजे साहेबांना सोडले, असा अर्थ होतं नाही – दिलीप वळसे पाटील
मंचर दि (प्रतिनिधी)आपण सत्तेत सामील झालो हा पक्षाचा निर्णय होता त्यामुळे आपण शरद पवार साहेबांना सोडलं असं होतं नाही तर पवार साहेबांबद्द्लचा आदर प्रेम मनामध्ये आजही आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील गाव भेट दौऱ्यादरम्यान केले.
विधानसभा निवडणुकानाचे बिबूल वाजल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील यांचा मतदारांशी संपर्क साधाण्यासाठी गावाभेट दौरा सुरु असून त्या दरम्यान वळसे पाटिल आपली भूमिका मतदारांपुढे मांडत तालुक्यातील मतदारांसोबत संवाद साधताना ते म्हणाले कि, गेल्या अनेक वर्षात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे मी मतदार संघात अनेक विकास कामे करू शकालो.माझ्या कार्य शैली मुळे मंत्री मंडळात स्थान मिळाले असल्यामुळे कोट्यावधी रुपयांची विकास कामे आपण मतदार संघात करू शकलो.
मतदारासमवेत संवाद साधताना वळसे पाटील यांनी पुढे सांगितले कि, पवार साहेबांना सोडल्याची चर्चा विरोधक करीत आहेत परंतु आतल्या गोष्टी कुणाला माहीत नसतात पक्षाच्या ५४ आमदारांची बैठक बोलावली गेली होती.त्यात अजित पवार यांनी सांगितले कि आपणाला सरकार मध्ये जायचं आहे. यात पक्षाच्या सुमारे ४०/४२ आमदारांनी या निर्णयाला पाठींबा दिला. त्यामुळे आम्ही काही पक्ष सोडला नाही किंवा सेना भाजप किंवा इतर पक्षात गेलो नाही. हा निर्णय घेण्यामागे कारण मंत्रिपद नव्हते, तर आपली जी विकासाची कामे आपल्या मतदारसंघात थांबली होती हि पूर्ण करायची होती.
मागील काळात करोनामुळे विकास कामे होऊ शकली नाहीत. हि अपूर्ण राहिलेली विकासाची कामे पूर्ण करणे आवश्यक होते.त्यामुळे पक्षातील बहुसंख्य आमदारांच्या मागणीनुसार सरकार मध्ये सहभागी झालो व यात अजित पवार अर्थमंत्री झाल्यामुळे त्यांनी भरभरून विकास कामासाठी पैसा दिला त्यामुळेआज विकास कामे मार्गी लागली आहेत. राजकारणात परिस्थिती प्रमाणे निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ असा नाही कि आपण साहेबांचे दुष्मन झालो अथवा साहेब आपलें दुष्मन झाले पवार साहेबांबद्द्लचा आदर व त्यांच्या बद्दलचे प्रेम हे मनात कायम आहे असे हि वळसे पाटलांनी सांगितले.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
October 20, 2024 at 9:07 am
अजितदादांवर प्रेम कायम ठेवुन शरद पवारांकडे पुन्हा जाऊ शकता का ? आदर आणी प्रेम व्यक्त करायचे आणी त्यांना सोडायचे ? असे होऊ शकते का ? ऊद्या सत्ता कोणाची पण येऊ दे . तुम्ही विकासासाठी तुम्ही त्यात सामील होणार का ???