राजकीय
आंबेगावात “मराठा समाज्याची” भूमिका महत्वाची ठरणार?, विधानसभेसाठी गांजाळे,बांगर, लांडे, चासकर यांची नावे चर्चेत…..!!!
मंचर दि. (प्रतिनिधी) आंबेगाव विधान सभेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महा युती असा सामाना होणात असून आहे परंतु मराठयांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असून यात मराठा समाज्याचा उमेदवार महायुती तसेच महा आघाडी यांच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते . आंबेगाव तालुक्यात मराठा मतदान मोठ्या प्रमाणावर आहे
.
दरम्यान मराठा समाज्याला ओ बी सी मध्ये सामाविष्ठ करण्याच्या मागणी वर मनोज जरांगे पाटील ठाम असून अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करूनही महायुती सरकारने त्यांच्या मागणीवर फक्त आश्वासनांचा पाऊस पडला आहे.त्यामुळे शक्य असेल तेथे मराठा उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली जाणार आहे.
दरम्यान आंबेगाव तालुक्यातून मराठा महासंघाकडून मंचर चे माजी संरपंच दत्तात्रय गांजाळे, ,अडव्होकेट सुनील बांगर, उभे राहू शकतात असे सर्वत्र म्हटले जातं असले तर गणेश खानदेशे अंकुश लांडे, बाबाजी चासकर प्रा saurab शिंदे, आदी इच्छुक उमेदवार आहेत.तरी या बाबत बोलताना सुनील बांगर यांनी सांगितले कि तालुक्यात मराठा समाज मोठ्या उभे प्रमाणावर असून तो कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचे पारडे फिरवू शकतो. त्यामुळे गरज पडल्यास उभे राहूच परंतु जो उमेदवार मराठा समाज्याला पुढील काळात मदत करेल त्याच उमेदवारास मराठा समाज मदत करेल व निवडूनही आणणार आहे. अशी भूमिका बांगर यांनी मांडली