राजकीय
” अजित गव्हाणे “हे भोसरीचे आमदार होणारच, काळ्या दगडावरील पांढरी रेष – मा आमदार विलास लांडे
पुणे दि (नेहे पाटील ) गेल्या दहा वर्षात भोसरी मतदारसंघात अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे.यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना विजयी करा असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी करांना केले
विधानसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ (दि.4) भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत माजी आमदार विलास लांडे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) रवी लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, पंडित गवळी, योगेश गवळी आदीं उपस्थित होते
यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले, बेरोजगारी, पाणी समस्या नागरी समस्या आदी समस्यामुळे भोसरीत बकाल अवस्था निर्माण झाली आहे.भोसरीतील गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेली हि परिस्थिती पाहून ग्रामस्थांनी चार महिन्यापूर्वी निर्णय घेतलाआहे . परिवर्तनाचा संघर्ष केला पाहिजे. या विचारावर ठाम राहून अजित गव्हाणे यांना तुम्ही परिवर्तनाची लढाई सुरू करा असे सांगितले.
आघाडी चे उमेदवात अजित गव्हाणे हे प्रामाणिक आणि सरळ आहेत.लोकसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघांमध्ये ग्रामस्थांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे जे केले तेच आता समोरच्या उमेदवाराचे होणार आहे याची खात्री आम्ही ग्रामस्थांनी अजित गव्हाणे यांना दिली आहे. यापूर्वी कोणाला कोणी उभे केले हे समस्त भोसरी विधानसभा जाणते. आम्ही खांद्यावर घेतले मात्र समोरच्याने काय केले हे वेगळे सांगायची गरज नाही. अशा शब्दात विलास लांडे यांनी विरोधकांवर टीका केली.
महा विकास आघाडीतील एकजूट कायम ठेवण्यासाठी रवी लांडगे यांनी माघार घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांचा हा मोठेपणा भोसरी ग्रामस्थ कधीही विसरणार नाही. राजकारणाचा हा सुसंस्कृतपणा बाबासाहेब लांडगे यांच्यापासून चालत आला आहे. जो रवी लांडगे यांनीही जोपासला. लोकांच्या हिताच्या दृष्टीने राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात. असेही लांडे सांगितले
“आपली रेष मोठी करा”
गेल्या दहा वर्षात अत्यंत वाईट परिस्थिती भोसरीने पाहिली आहे. म्हणूनच 20 नोव्हेंबर रोजी तुतारी समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. असे आवाहन करत लांडे म्हणाले कि काळजी करायचे काही कारण नाही.नाथ साहेबांच्या समोर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा शब्द दिला आहे.
राज्यात भोसरीचे नाव आपल्याला मोठे करायचे आहे. रेष वाकडी किंवा बंद करून गावचा विकास आपल्याला बंद करायचा नाही. तर भविष्याची उंची गाठायची आहे यासाठी आपली रेष मोठी करायची आहे.
………..