राजकीय

भोसरीमध्ये  अजित गव्हाणे यांचा जोरदार प्रचार,”रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी” म्हणत सर्वस्थरातून  वाढता पाठिंबा 

Published

on

भोसरी दि. (प्रतिनिधी) भोसरी मतदार संघातील विविध गावे तसेच वस्ती अथवा वसाहतीतून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना वाढता पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हेच घोष वाक्य ऐकावायास मिळत आहे तर जागोजागी अजित गव्हाणे यांचे औक्षण करून महिलांवर्ग पाठींबा व्यक्त करीत आहेत.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राधाकृष्ण नगर, चक्रपाणि वसाहत, महादेव नगर तसेच लांडगे वस्ती परिसरामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या यादरम्यान पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांशी संवाद साधत अजित गव्हाणे यांनी आगामी काळात नागरिकांना या परिसरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळेल असे सांगितले. 

दरम्यान आजच्या पदयात्रेत नुकतेच भाजपमधून महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेल्या माजी नगरसेविका सारिका लांडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे यांनी देखील सहभाग घेतला. या भागातील दडपशाही मोडून काढण्यासाठी अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करणार आहे असे संतोष लांडगे म्हणाले. संतोष लांडगे यांनी अजित गव्हाणे यांच्यासोबत पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधला. आपले प्रश्न अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून सोडवले जातील..त्यामुळे अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन संतोष लांडगे यांनी नागरिकांना केले. 

तरुणांचा स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सहभाग

आजच्या सभेत युवकांचा अजित गव्हाणे यांना प्रचंड पाठिंबा असल्याचे दिसून आले. अनेक तरुण स्वयं स्फूर्तीने अजित गव्हाणे यांच्यासोबत पदयात्रेत चालताना दिसत होते. यावेळी काही तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही. तरुणांशी संवाद साधताना अजित गव्हाणे यांनी आगामी काळात आपल्या शहरातील औद्योगिक बेल्ट लक्षात घेऊन स्मॉल क्लस्टर उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मोशी येथील एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर पूर्णपणे कार्यान्वित व्हावे यासाठी पावले उचलली जातील असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.

कामगारांशी चर्चा, समस्या सोडविण्याचे आश्वासन 

अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीच्या बाहेर कामगारांशी संवाद साधला. कामगारांची भेट घेऊन आगामी काळात त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. कामगारांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले या औद्योगिक नगरीसाठी शरद पवार यांनी केलेले काम आम्ही विसरलेलो नाही.त्यांच्या माध्यमातूनच येथील कारखानदारीला बळ मिळू शकते याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी कामगार खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version