सामाजिक
आगामी विधानसभा आंबेगावच्या भविष्याची नांदी :, मतदार कोणाला कौल देणार, तर कोणाला पाणी पाजणार…….
मंचर दि (प्रतिनिधी)-आंबेगाव विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या आरोप प्रत्यरोपाच्या फैरीत डिंभे धरण पाणी प्रश्न प्रचंड प्रमाणावर गाजला असून येणाऱ्या मतदानात मतदार राजा कोणाच्या बाजूने “कौल” देणार तर कोणाला “पाणी” पाजणार हे पहाणे याबाबत अनेकांत उत्सुकता निर्माण झाली आहे.
“आगामी काळात पाणीप्रश्न, बिबट्या, जमीन माफिया, आरोग्य, बेरोजगारी, शौक्षणिक सुविधा, पर्यावरण ऱ्हास आदी प्रश्न भेडसावणार “
महाराष्ट विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्याचा प्रचार संपत आहे . त्यामुळे आंबेगाव तालुक्यात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व त्यांचेच एकेकाळचे खंदे समर्थक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या सरळ लढत सुरु आहे. त्यातच देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांनी वळसे पाटलाचा पराभव करा असे आवाहन केले असले तरी त्यांनी डिंभे धरणाला बोगदा पाडून ते पाणी कर्जत जामखेड कडे वाळविण्याच्या विषयावर बोलणे टाळले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम कायम आहे.
“कोणीतरी म्हटले आहे कि, कर्ण कितीही चांगला पराक्रमी दानशूर वाटत असला तरी,त्याच्या विजयाचा फायदा जर दुर्योधनास होणार असेल तर त्याचा पराभव करणं हि तुमची जबाबदारी असली पाहिजे या साठी विचारपूर्वक मतदान करा”
दरम्यान शरद पवार जे बोलतात ते त्यापेक्षा उलटेच करतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे जरी पवार यांनी वळसे पाटलांना पडण्याविषयी आवाहन केले असले तरी हि घोषणा त्यांच्या उलट करण्याच्या वृत्तीतून आहे. जर त्यांना वळसे पाटलांचा खरचंच पराभव करावायाचा असता तर त्यांनी डिंभे धरणाच्या पाण्याविषयीची भूमिका मतदा्रांसमोर मांडली असती परंतु त्यांनी ती जाणीव पूर्वक टाळली असावी असे जाणकारांचे मत आहे.
तालुक्यामध्ये सुरु असलेली राजकीय स्थिती पाहाता वळसे पाटलांनी डिंभे धरणाच्या पाण्याच्या मुद्द्यावर पवारांची सोडलेली साथ हि वळसे पाटलांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. कर्जत जामखेड मध्ये खासदार निलेश लंके डिंभे धरणाचे पाणी बोगदा पाडून कर्जत जामखेडला देणार असे म्हणत आहेत तर नुकत्याच झालेल्या घोडेगाव येथील सभेत जयवंत पाटील यांनी बोगदा कधी मंजूरच झाला नाही असे सांगितले याचा अर्थ वळसे पाटलांनी घेतलेली भूमिका खोटी ठरवून जनतेला उल्लू बनविनयाचा प्रकार सुरु आहे का? अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांनी आपल्या भाषणातून सांगितले कि, आपल्या वाट्याचे पाणी पाणी वाटपाच्या काळात आपल्या तालुक्यासाठी वधातन क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यासाठी राखून ठेवलें आहे त्यामुळे आपलें पाणी कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे येणाऱ्या फोन दिवसांनंतर होणाऱ्या मतदानात मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार व कोणाला पाणी पाजणार हे येणारा काल डी ठरविणार आहे
दरम्यात यावेळी होनारी विधानसभेची निवडणूक तालु्याच्या पुढील भविष्याची नादी असून यावेळी मतदारांना खूप विचारपूर्वक आपलें बहुमोल मत उमेदवार यांच्या पारड्यात टाकायचे आहे कारण पुढील काळात जमीन माफी्यांनाचा वाढणारा धुमाकूळ, पाणी प्रश्न, आरोग्य शिक्षण बेराजगारी आदी प्रश्न ऐरनी वर असणार असे अनेक तज्ञाचे मत आहे.