मंचर दि. (संजय कोकणे पाटील) आंबेगाव तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचंड चुराशीची झाली तालुक्याचे आमदार दिलीप वळसे(पाटील) यांनी आंबेगाव विधानसभा मतदार संघावर असलेले आपले निर्विवाद वर्चस्व तब्बल आठव्यांदा सिद्ध करीत हि विजयश्री खेचून आणली परंतु या विजश्रीचा खरा शिल्पकार व आंबेगाव या देवभूमीचे इंद्र….. हे “देवेंद्र” शाह होत
आंबेगाव या देवभूमीचा इंद्र..”देवेंद्र”
“एकाबाजूला “श्री क्षेत्र भीमाशंकर” तर दुसऱ्या बाजूला सर्व विघ्नहर्ता सुखकर्ता, दुःखहर्ता रांजणगावचे “महागणपती” यात पसरालेल्या विधानसभा मतदार संघात दिलीप वळसे पाटलांच्या विजयाची ध्वज पताका फडकविणारा आंबेगाव या देवभूमीचा खरा इंद्र… म्हणजेच “देवेंद्र”
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीची झालेली पीछेहाट या मुळे महाराष्ट्रात काय होणार याची धाकधूक होती खरी पण त्या पेक्षाही ज्यांनी आंबेगावचे गेली पस्तीस वर्षे नेतृत्व केले राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवत नामदार दिलीप वळसे पाटील यांनी योग्य नियोजन करीत, आंबेगावच्या जनतेला दुष्काळाच्या खाईतून काढून आंबेगाव तालुक्यात जलरूपी विकासाची गंगा आणली.व आंबेगाव तालुक्याची कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख कायम स्वरूपी पुसून टाकत तालुक्याला बागयती बनविले. तालुक्यात सामाजिक सलोखा जपत शौक्षणिक, धार्मिक, आरोग्य, सामाजिक त्यासोबत रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता कृषी क्षेत्रावर आधारित कंपण्यांची उभारणी केली.
मागील काळात पक्षफुटीत नाट्यात वळसे पाटलांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर तालुक्यात वळसे पाटलांचे राजकीय भवितव्य काय असेल? हे सांगता येत नव्हते सुरवातीच्या काळात वळसे पाटलांच्या विरोधात प्रचंड नाराजी दिसत होती. त्यातच मंचर येथील जाहीर सभेत वळसे पाटील गद्दार आहेत त्यांना पराभूत करा.. करा… करा… अशी भावनिक साद घालुन शरद पवार यांनी भर सभेत आंबेगावकर जनतेला आवाहन केले.
दरम्यान अशा नकारात्मक स्थितीतही थोरल्या पवारांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी देवेंद्र शाह यांनी साहेबांची कन्या पूर्वा, मेहुणे यशवर्धन, भीमाशंकर सह साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपाचे निरीक्षक अतुल ब्रम्हभट व काही निवडक कारकर्त्यांना घेऊन व्युव्ह रचना केली महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे योग्य नियोजन केले.
देवेंद्र शाह यांनी आखलेली कृष्ण नीती कि,चाणक्य नीती, हिचा योग्य वापर करीत त्यांनी वळसे पाटलांसाठी दुरास्पद वाटणारा विजय हा प्रतिकूल परिस्थितीत नियोजनबद्ध राजकीय गणिते जुळवत आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह अत्यंत सूक्ष्म नियोजन केले.व त्यानुसार महायुतीचे कार्यकर्त्यांना योग्य सुनियोजन देऊन दिलीप वळसे पाटलांचा आठवा विजय अक्षरशः खेचून आणला त्यामुळे वळसे पाटील यांना पुन्हा आठव्यांदा आंबेगावकरांनी विजयी केले दिलीपरावांच्या या आठव्या विजयाचा शिल्पकार व राजकीय पटलावरील खरे चाणक्य ठरले ते दुसरे तिसरे कोणी नसून दिलीप वळसे पाटलांचे खरे निकटवर्तीय देवेंद्र शाह… होत