राजकीय
वळसे पाटलांच्या “अष्टविजयासाठी यावेळी दमछाक का? झाली,” श्रेयवादापेक्षा, आत्मचिंतन गरजेचे….
मंचर दि. (प्रतिनिधी) राज्यात भाजपा समवेत महायुतीला प्रचंड नव्हे अभूतपूर्व यश मिळाले परंतु आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांची मात्र हा अष्ट विजय मिळविताना प्रचंड दमछाक झाली या अटीतटीच्या निवडणुकीवर श्रेया घेण्यासाठी धडपडण्यापेक्षा झालेल्या निसटत्या विजयावर आत्मचिंतन गरजेचे आहे.
गेली पस्तीस वर्षे चढत्या क्रमाणे निवडून येणारे वळसे पाटील यावेळी मात्र थोडक्यात बचावले. हा वळसे पाटलांचा विजय म्हणजे जीवावर आले पण बोटावर निभावले अशीच काहीशी स्थिती झाली असताना मात्र लीड कमी झाले याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा आमच्यामुळेच विजय झाला असे अनेक दावे प्रतिदावे महायुतीतील विविध कार्यकर्त्यांकडून होत आहेत हिच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे
आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांची मते मिळविण्यासाठी झालेला संघर्ष पहाता तालुक्यात त्यांच्या बाबत असलेली विरोधी लाट मावळून विजय म्हणजे त्यांचे पूर्व पुण्यच म्हणावे लागेल कारण सुमारे सत्तर हजाराचे लीड तोडून हा विजय अवघा सुमारे पंधराशे मतांनी झाला आहे. झालेला विजय साजरा करावा त्याबद्दल काहीच दुमत नाही परंतु हा मिळालेला विजय आमच्यामुळे मिळाला असे सांगण्यासाठी आता अनेकांची श्रेयाची मोठी लढाई सुरु झाली आहे असे दिसते. तालुक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना हा विजय मिळाला आहे यात शंका नाही यासाठी वळसे पाटील व त्यांच्या अष्टप्रधान मंडळाने केलेले योग्य व अचूक नियोजन होय असे म्हणणे वावगे ठरणार नाही
गेली अनेक वर्षापासुन एक गाणे तालुक्यात ऐकले जाते ते म्हणजे “कोणी कितीही करा हल्ला दिलीप रावांचा मजबूत किल्ला” खरेतर या किल्ल्याचे अनेक बुरुज अक्षरशः निकामी झाले असल्याचे या निवडणुकीत लक्षात आले आहे तरीही श्रेय घेण्याची व फुकटच्या तोंडाच्या वाफा सोडण्याची वृत्ती, अजूनही लाभार्थी कार्यकर्त्यांची गेलेली नाही याचे कारण असे कि, निवडणूक झाल्यानंतर हा विजय आमच्यामुळे झाला असेच सांगत आहेत म्हणतात ना… यशाचे सर्वच धनी होतात. पण किती श्रेय घ्यावे किमान यालाही मर्यादा असतात.वळसे पाटलांच्या विजयाचे श्रेय ज्यांना द्यायला हवे, ते बिचारे गप्प आहेत ते आपले काम प्रमाणिक पणे करून बाजूला हि झाले… असो
खरेतर या निसटत्या विजयाचा उत्साह साजरा करताना मतांची टक्केवारी एव्हडी कमी का? झाली हे शोधणे अतिशय गरजेचे आहे. कारण तालुक्यात वळसे पाटलांनी गेल्या पस्तीस वर्षाच्या कालावधित विविध गावात असलेला पाणी प्रश्न, घोडनदीवर कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे, डिंभे धरण कालवा निर्मिती विविध नळपाणी पुरवठा योजना वसतिगृहे, हॉस्पिटल,गावोगावी रस्त्यांचे जाळे,इंजिनिअरिंग कॉलेज बँक पतसंस्था, यातून उद्योग व्यवसायास प्रोत्साहन आदी विविध विकास कामे केली तरीही यावेळी इतका विरोध का?व्हावा याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.
याचा अर्थ असा कि खरच कार्यकर्त्यांनी योग्य व प्रमाणिकपणे काम केले असतें तर हा विजय निसटता नक्कीच नसता.हे हि खरेच परंतु चमचा चमचा मिळविण्यासाठी सभोवताली गोंडा घोळणारी लाभार्थी किंवा मलिदा गँग या विषयी झालेला प्रचार पहाता यातून वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्यातील जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी जमिनीवरून काम करणे गरजेचे आहे. कारण हा निसटता विजय बरेच काही शिकवून जातो परंतु त्याचे चिंतन करून योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
November 27, 2024 at 1:15 pm
खरंतर हा विजय फक्त कागदावरच आहे . तांत्रिकदृष्ट्या तो पराभवच आहे .परंतु विजय हा विजयच असतो . हरकत नाही .आठ जिल्हा परिषदांपैकी घोडेगाव जिल्हा परिषद आणि मंचर जिल्हा परिषदेमध्ये जे साहेबांना लीड मिळालं खास करून घोडेगावच्या लोकांनी जे दिलं .ते माननीय कैलासबुवा काळे यांच्या नेतृत्वामुळे . 35 वर्ष साहेबांबरोबर राहिलेल्या माणसांनी साहेबांच काम केलं नाही . पण गेले सात-आठ वर्षांपूर्वी साहेबांबरोबर गेलेले कैलासबुवा यांनी मात्र प्रामाणिकपणाने काम केलं .आणि साहेबांना निवडून येण्यासाठी मदत झाली ज्या घोडेगाव वरती सतत अन्याय झाला त्याच घोडेगावकरांनी साहेबाला तारले .निदान आता तरी घोडेगाव वरती अन्याय होणार नाही घोडेगाव वर दुर्लक्ष होणार नाही .याची काळजी माननीय वळसे साहेबांनी घेतली पाहिजे .असं मला एक घोडेगावचा सुजाण नागरिक म्हणून सांगावसं वाटतं .पटलं तर घ्या नाही पटलं तर पुढे जनता आहेच .???