शैक्षणिक

महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनीकडून “ग्रंथ दिंडी” सोहळ्याचे उत्साहात आयोजन…..

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) पुस्तके माणसाच्या जीवनातील महत्वाचे स्थान आहे ग्रंथामुळे माणसाला नवनवीन ज्ञान मिळून त्याच्या जीवनास  नवी दिशा मिळते त्यामुळे “ग्रंथ हे गुरु आहेत” असे प्रतिपादन महात्मा महात्मा गांधी विद्यालय चे प्राचार्य उत्तम आवारी यांनी केले 

दरम्यान या ग्रंथ दिंडीमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले,आंबेडकर अशा अनेक  समाजसुधारकांचे जीवन चरित्र, सुविचार संग्रह,सरदार वल्लभभाई पटेल,सार्थ ज्ञानेश्वरी आदी अध्यात्मिक पुस्तके सजवलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आले. पुस्तकांचे यावेळी प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

त्याचप्रमाणे या प्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य आवारी म्हणाले कि, ग्रंथ हेच गुरु या उक्तीप्रमाणे पुस्तके आपल्याला ज्ञान देत असतात आपली बुद्धी विकसित पावते व यामुळे जीवनाला एक नवी दिशा मिळते म्हणून ग्रंथांचे महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे अशी माहिती प्राचार्य उत्तम आवारी यांनी दिली. ग्रंथपाल कैलास तातळे,प्रवीण कानडे,संतोष मुंढे यांनी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version