शेतीशिवार
आंबेगाव तालुक्याचे आदिवासी गावात “बिबट्याचे” वाढते हल्ले :नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण
मंचर दि (प्रतिनिधी)-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात बिबटयाचा संचार वाढला असून जांभोरी (ता आंबेगाव) येथे भागुजी रामजी केंगले या शेतकऱ्याची शेळी बिबट्याने फस्त केली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान आदिवासी भागात पाणी टंचाई असल्याने महिला वर्गाला दूरवरून जंगल रस्त्याने पाणी डोक्यावर घेऊन दोन ते पाच किलोमीटर पायापीट करावी लागते.त्याचप्रमाणे वाडी वस्तीवर राहणारी लहान लहान शाळकरी मुले गावाच्या ठिकाणी तीन ते पाच कि मी पर्यंत पायापीट करून दररोज शाळेला येत असतात. तसेच आदिवासी गाव वाड्यावरील शेतकऱ्यांचे हिरडा हे मुख्य पीक असल्यामुळे हिरडा काढण्यासाठी अरण्यात जावे लागते. हा सर्व भाग दाट झाडीचा असल्याने जंगलात कड्या कपारीत किंवा दाट झाडीतून बिबड्या सारखे हिंस्त्र प्राणी वाटेल दबा धरून बसू शकतात त्यामुळे जीव मुठीत धरूनच येथील नागरिकांना ये – जा करावी लागते.
त्याचप्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागाप्रमाणे पश्चिम आदिवासी भागातील पाळीव जणावरांवर दररोज बिबट्याचे हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आदिवासी भागातील जांभोरी गावातील शेतकरी भागूची केंगले यांच्या मृत शेळीचा पंचांनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग युवा नेते मारुती केंगले यांनी केली आहे.