पर्यटन
पराग मिल्क च्या “गो चीझ” आनंदोत्सोव मेळाव्यास नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद
मंचर दि. (प्रतिनिधी)-दुग्ध उत्पादनात संपूर्ण जगाच्या बाजार पेठेमध्ये नाव लौकिक मिळविलेल्या पराग मिल्क या कंपनीकडून सुरु झालेल्या “गो चीझ वल्ड” आनंदोत्सोव मेळाव्यास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
“कोणत्याही परिस्थितीचा परिपूर्ण उपयोग करून जण माणसांत जो आनंद वाटतो व साक्षीभावातून सर्वांमध्ये आनंद निर्माण करणारा व्यक्ती खरां ब्रम्ह स्वरूप… म्हणजेच ईश्वर स्वरूपच…. कारण असा आनंद वाटण्याऱ्याचे मनही आकाशा प्रमाणे अथांग असावे लागते. “आकाश” हे शब्द स्वरूप असल्याचे सांगितले जाते व संस्कृत मध्ये “अली” म्हणजे “देव”… म्हणजेच (शब्द +अली =शब्दाली)अशा शब्द स्वरूप देव तत्वाला बांधून अनेकांच्या मनात आनंद पेरण्यासाठीच जणू या् आनंदोत्सोवाची संकल्पना साकारली आहे. कंपनीच्या संचालिका “शब्दाली” यांनी…..
जगाच्या बाजार पेठेत आपल्या उत्कृष्ठ दुग्ध उत्पादांनासाठी नावाजलेल्या पराग मिल्क (गोवर्धन डेअरी) या प्रकल्पच्या माध्यामातून पुणे नाशिक महामार्गवरील मंचर येथे कंपनीच्या आवारात सुरु करण्यात आलेल्या भव्य अशा “गो चीज वल्ड” या भव्य दालणामध्ये या आनंदो उत्सोवाचे आयोजन करण्यात आले आहे. खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील तसेच पुणे नाशिक महामार्गवर येणारे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर या आनंदोत्सोव मेळाव्यात आपल्या कुटुंबातील बच्चे कंपनी समवेत हजेरी लावत आहेत. व या ठिकाणी विविध स्पर्धात्मक खेळात भाग घेऊन विविध बक्षिसे जिंकून याच ठिकाणी असलेल्या कंपनीच्या भव्य दालानात बसून “गो चीझ” पासून बनविलेल्या विविध स्वादिष्ठ व चविष्ट नवनवीन खाद्य पदार्थांचा मनमुराद आनंद हि घेत आहेत.
दरम्यान दि 22डिसेंबर रोजी सुरु झालेल्या या “गो चीझ आनंदोत्सोव” मेळाव्यास सर्व स्थरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अनेक कुटुंबातील चिमुरड्या पासून वृद्धापर्यंतची सर्व मंडळी या मेळाव्यात उत्साहाने भाग घेऊन हा गोवर्धन चा “गो चीझ” आनंदोत्सोव साजरा करीत आहेत .
सद्या नाताळ सुरु होत आहे. ख्रिस्त धर्माचे संत येशू यांच्या जन्म दिवसांनिमित्त नाताळ साजरा होतो. देशात नव्हे तर जगात या संताच्या जन्माचा आनंदत्सोव साजरा केला जातो. हे खरे परंतु आनंदत्सोव साजरा करण्यासाठी काहीही कारण लागतंच असे नाही तर मनात उमंग व वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदात घालावीण्याची उर्मी असावी लागते. त्यासाठी भरभरून आनंद वाटण्याची तयारी ठेवावी लागते. हा आनंद तोच देऊ शकतो. जो काळाच्या (भूत व भविष्याच्या) आवरणात जगण्यापेक्षा वास्तव्यात म्हणजेच वर्तमानात जगतो. व या जीवनाचा खरां आनंद घेतो
दरम्यान आनंद साजरा करायला काही कारण लागतंच असे नाही, आनंद साजरा करण्याची मनापासून निर्माण झालेली इच्छा हिच आनंदोत्सोव साजरा करण्याची स्थिती आहे व जो आनंदी राहू शकतो व आनंद वाटू शकतो तोच आनंदोत्सोवाद्वारे विश्व् आनंदाची मनीषा बाळगतो.