सामाजिक
“कथाकथित पुढारी” वाढदिवसाला भरवून “बैलगाडाच्या शर्यती”…. त्यामुळे शेतकऱ्याच्या तरुण मुलांच्या भविष्याची होतेय का माती?…..
मंचर दि-(प्रतिनिधी) ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी हा शाळा महाविद्यालयात दिसण्याऐवजी गावोगावी बैलगाडा घाटात मावा गुटका गांजा दारू आदी मादक पदार्थ्यांच्या विळख्यात अडकून, तरुण पिढी बरबाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यासाठी विचार होणे गरजेचे आहे.
काही वर्षापूर्वी बैलगाडा शर्यतीवर काही पर्यावरण प्रेमीनीं न्यायालयात धाव घेऊन बंद करण्याविषयी याचिका दाखल करून या शर्यतिमधून मुक्यापाळीव प्राण्यावर कशाप्रकारे अत्याचार होतो? हे दाखवून देत बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली त्यानंतर ग्रामीण भागातील बळीराजाने यांस विरोध दर्शवीला बैलगाडा सुरु व्हावा यासाठी अनेक समर्थक संघटना या साठी धावून आल्या न्यायालयात लढाई लढण्यात आली परंतु निसर्ग मित्र संघटनाही एकत्रित होऊन पाळीव प्राण्यांच्या अत्याचाराची गांथा न्यायालयात मांडत अनेक वर्ष लढत होत्या. परंतु बैलगाडा या स्पर्धा सुरु होणे दुरास्पद वाटतं होते अखेर बैलगाडा शर्यत हा परंपरागत असलेला खेळ पुन्हा सुरु व्हावा. याकरिता शासनाने आपली बाजू न्यायालयात प्रखरपणे मांडली व अखेर शेतकऱ्याची बाजू ऐकत न्यायालयाने या शर्यतींना परवानगी दिली. याचे जन्मानसातून पेढे वाटतं कौतुक हि करण्यात आले. परंतु हिच बैलगाडा शर्यत शेतकऱ्याच्या पोराच्या भविष्याची काळोखमय याताना होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेली अनेक पिढ्यांपासून सुरु असलेली “बैलगाडा शर्यत” खरी तर खूप पुरातन काळापासुन सुरु असल्याचे बोलले जाते. असे म्हणतात जुन्या काळात अनेक लोक आपल्या कुटुंबासमवेत खंडोबाला दर्शनासाठी जातं त्यावेळी प्रवास हा बैलगाडीनेच होता.जेजुरीसारख्या तीर्थस्थानी गेल्यानंतर तिथे खंडोबाच्या नावाने भंडारा उधळत “बैलगाडा” घाटात पळविण्याची प्रथा सुरु झाली. नंतर त्याचा प्रसार होऊन गावोगावीच्या ग्रामदैवतांच्या यात्रांमध्ये बैलगाडे पळविले जावू लागले. अशाप्रकारे बैलगाडा शर्यतींचा प्रसार झाल्याचे जुन्यापिढीच्या मंडळींकडून सांगितले जाते.
परंतु शर्यतींनी इतके भयावह रूप घेण्यास सुरुवात केली आहे कि त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो शेतकऱ्यांची कुटुंबे बरबादीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र पाहावायास मिळत आहे.आता या स्पर्धानी वेगळेच उग्र वळण घेतलेले दिसते. ग्रामदैवताच्या यात्रा सोबत इतर विविध देवातांच्या यात्रेसाठी हि या स्पर्धाचे आयोजन सुरु झाले अनेक कथाकथित राजकीय पुढारी आपल्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धाचे आयोजन करीत आहेत यात त्या मुक्या प्राण्याची ओढातान तर होतच आहे. परंतु या स्पर्धाँमुळे तरुणांई मात्र भरकटू लागल्याचे दिसत आहे. आज या बैलागाडा शर्यतिमुळे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात युवक वर्ग भरकटत चालला असून अधिकाधिक व्यसनाधीन होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावायास मिळत आहे.
दरम्यान आज बैलगाडा शर्यतिमुळे शाळा महाविद्यालये ओस पडत असून बैलगाडा घाट मात्र तरुणांईने प्रफुल्लित होत. या ठिकाणी मादक पदार्थाचे सेवनही होत असल्याचे विरादक चित्र सर्वत्र पहावायास मिळत आहे. बैलगाडा शर्यती बंद कराव्यात यातून हि मागणी नाही तर, फक्त आपले ग्रामदैवत यात्रेत शर्यत भरवावी व जे गावकरी पुढऱ्याच्या हाताचे खेळणं होऊन कथाकथित पुढऱ्याच्या सवंग लोकप्रियतेसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरवून तरुणाईला नादाला लावून आसुरी आनंद घेत आहेत. ते आपल्या सोबत या समाज्याचेही नुकसानच करत आहेत. त्यासोबत आपल्याच पुढील पिढ्या बरबाद करित आहेत हे तेव्हढेच सत्य आहे.