सामाजिक
“नवीन विश्व् साकरण्याचा संकल्प करूया”, चला जिंकूया… विजयी होऊया….
मंचर दि. (प्रतिनिधी )-उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत, या नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करूया मनातील नकारात्मक विचारांची होळी करून नवीन संकल्पना मनात घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून नवीन विश्व् साकरण्याचा संकल्प करूया जिंकूया जिंकूया फक्त जिंकूया व विजयी होऊया….
भगवान श्री कृष्ण यांनी परिवर्तनच ब्रह्मांडाचा नियम असल्याचे सांगितले या ब्रह्मांडात सर्वत्र परिवर्तन होत आहे यात जन्माला आलेले मुलं यांच्या क्षणोक्षणी बदल होत तरुणांईकडे तर त्यातून वृद्धावास्थेकडे जातं आहे या विश्वात जे नवीन तयार होणार ते केंव्हातरी नष्ट होणार असे म्हंटल जाते जे चिरकाळ टिकते ते फक्त “ब्रम्ह” म्हणजे च आपले विचार होत कारण विचारातून कर्म घडते म्हणजेच कोणतेही कर्म घडण्यासाठी विचाराची गरज आहे.
दरम्यान हा विचार कोठून कसा निर्माण होतो. आपण अनेक पुस्तके वाचतो त्यात सांगितले जाते मानवाच्या मनात जास्तीतजास्त वाईट विचार म्हणजेच नकारात्मक विचार येत असतात. हेच नकारात्मक विचार बाजूला ठेवून मनात मन सकारात्मक केले तर तुमचे जीवन फुलून जाईल. यासाठी मनुष्याने वर्तमानात जगावयास हवे वर्तमानात जगणे, ते कसे जगावे? हाच प्रश्न अनेकांच्या मनात पडला असेल तुम्ही सर्वत्र पहा प्रत्येक व्यक्ती हा वर्तमानात जगण्यापेक्षा भूत किंवा भविष्यातच जगतो ते कसे? तर, प्रत्येक माणसाच्या मनात जेव्हा केंव्हाही विचार सुरु असतात ते भुताकाळातील घडलेल्या चांगल्या वाईट घटनाचे अथवा भविष्यात काहीही चांगले वाईट व्हावे किंवा करावे या बाबातच व्यक्ती विचात करतो .
मात्र कोणताही व्यक्ती वर्तमानकाळात जगताना दिसत नाही तुमच्या हातातील प्रत्येक वर्तमानाचा क्षण भूत होत आहे. त्यामुळे तुमच्या हातात असलेला प्रत्येक वर्तमानाचा क्षण कसा चांगला जगता येईल याचा विचार व त्याप्रमाणे कर्म केले पाहिजे तरच तुमचा भविष्यकाळ उज्वल होईल यात शंका नाही. यासाठी कोणाविषयी आकस राग, सुडाची भावना यांना तिलांजली देताना सोबत लोभ, आसक्ती लाही आपल्यापासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजेच साक्षीभावाने जगावे आज या जगात चाललेली कुलियुगी दुषकृत्ये पाहुन असंख्य संत महात्मे यांनी दिलेल्या अनमोल विचारांचे अनुकरण करण्याबाबत प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे, कारण वर्ष ख्रिती असो मुस्लिम असो वा हिंदू चांगले संकल्प करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते गरज असतें ती चांगल्या विचारांची…… सर्व वाचक हितचिंतक यांना बोभाटा परिवारातर्फे 2025 या नूतन वर्षाचे निमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा…..