सामाजिक
मंचर शहराच्या कारभाराची स्थिती, म्हणजे “अंधेर नगरी आणि चौपट राजा” सारखी…..
मंचर दि- (प्रतिनिधी) शहरांच्या विकास कामे प्रचंड नियोजन शून्य पद्धतीने सुरु असल्याची चर्चा असल्यामुळे नगराचा कारभार म्हणजे “अंधेर नगरी आणि चौपट राजा” अशी असल्याची उत्फूर्त प्रतिक्रिया अनेक नागरिक खाजगीत देत असल्याचे चित्र आहे.
मंचर शहराला सामाजिक, धार्मिक, शौक्षणिक, क्रीडा, राजकीय,दृष्ट्या विविध क्षेत्रात प्रचंड वारसा आहे. मंचर शहरातील अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रात प्रचंड नावलौकिक मिळविला आहे. आजही अशा अनेक प्रतिभावंत व्यक्तींची नावे मोठ्या आदरांने घेतली जातात. मंचर शहर हे आंबेगाव तालुक्याचे व्यापारी दृष्ट्या प्रमुख केंद्र असून या ठिकाणी अनेक गावातील नागरिक महिला आबाल दृढ विविध कामासाठी येत असतात त्यामुळे या ठिकाणी घडणाऱ्या कला क्रीडा शौक्षणिक राजकीय व सामाजिक घडामोडींचा परिणाम तालुक्याच्या विविध छोट्या गावांवर होतो.
त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत मंचर शहराची विकासाची घडी विस्कटल्या सारखीच झाली असल्याचे बोलले जातं आहे. म्हणतात ना…. “मांजर झाले जाड, अन उदरांचा झाला सुळसुळाट” या उक्ती प्रमाणे शहरासाठी योगदान असलेल्या चांगल्या ग्रामस्थांच्या विचारांना तिलांजली देत प्रशासनाने काही कथाकथित गाव पुढारी व ठेकेदार यांच्या फायाद्यासाठी विकास कामे सुरु केली असून हि सर्व कामे अतिशय नियोजन शून्य पद्धतीने केली जातं असल्याचर ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान मंचर शहराच्या विकासाठी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी तसंचे तालुक्याचे आमदार व माजी खासदार तसेच आदी लोकप्रतिनिधिंनी कोट्यावधी रुपयांचा निघी मंचर शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला.परंतु नगर पंचायातीत प्रशासकीय कारभार असल्यामुळे गावंच्या विकासाबाबत शहरांतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तींना विचारात न घेता काही कथाकथित गाव पुढऱ्यांच्या सांगण्यावरून प्रशासनाने गावात विविध विकास कामांचे नारळ फोडले व कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरु करून विकास निधीची लाईलूट केली जातं असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान शहरात सुरु करण्यात आलेली अनेक विकास कामे अतिशय नित्कृष्ट दर्जाची असून ती कामे शहरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून व शहराच्या दृष्टीने पुढील काही वर्षाचे नियोजन डोळ्या समोर धरून विचार करणे आवश्यक होते परंतु वाढत्या शहरांच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्या ऐवजी अतिशय नियोजनशून्य पद्धतीने विकास कामे करण्यात आली आहेत असे विविध जाणकाराचे मत आहे.त्यामुळे शहराच्या विकासाची अवस्था पाहून नगर पंचायतीच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असून शहरात सुरु असलेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान मंचर ग्रामपंचायतीचे, नगर पंचायत पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहरात जनतेच्या गरजेची विविध योग्य कामे होतील अशी नागरिकांची अपेक्षा होती कारण मंचर शहरात तालुक्याच्या विविध गावातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात परंतु याठीकाणी येणाऱ्या व्यक्तीसाठी स्वच्छाता गृह नाहीत. राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या सन्मानबाबत गतिशील असताना मात्र मंचर शहरात मात्र महिला वर्गासाठी साधे स्वच्छतागृह नगर पंचायतीला उभे करता आले नाही. मात्र नगर पंचायतीने उपलब्ध जागेवर नियोजन शून्य पद्धतीने बिल्डिंग उभ्या करवून त्यातून कोणाचे हात ओले करण्याचा प्रयत्न केला जातं आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.