सामाजिक
जनतेच्या सेवेसाठी, तत्पर सदैव…होऊ पहाणाऱ्या, “पूर्वा” यांचे कार्य,भविष्यातील बांधणीसाठी ठरेल का? “अपूर्व”
मंचर दि (प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात दरवेळी हजारोंच्या मतांधिक्याने विजयी होणारे राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देवदत्त निकम यांच्याकडून अगदी निसटता विजय मिळाला त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना तालुक्यात त्यांची कमी झालेली ताकद समजली हे नक्की…..परंतु आत्मचिंतन करून पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करून घडी बसविण्यासाठी वळसे पाटलांनी कंबर कसली असून पुनर्णिमाणाचे काम करण्यासाठी चे “अपूर्व” कार्य वळसे पाटलांच्या कन्या “पूर्वा” यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे…
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष पुन्हा बांधणी करण्यासाठी कार्यकर्ता संवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अडीवरे येथे ‘कार्यकर्ता संवाद कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी.पूर्वा वळसे पाटील यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत .आदिवासी भागातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्याबाबत चर्चा केली.
“अडिवरे येथे कातकरी वस्ती येथील दोन घरांचे अचानक आग लागल्याने नुकसान झालेल्या कुटुंबियांना भेट देऊन “अलका वळणे व सुवर्णा पवार” या दोन्ही महिलांना प्रत्येकी रु. २५०००/- मदत “पूर्वा वळसे” यांच्या उपस्थितीत देण्यात आली”
माजी मंत्री आ.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून आहुपे खोऱ्यात सुरू असलेली विविध विकासकामे व प्रलंबित कामे यांचा आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे अनुसया महिला उन्नती केंद्र, मंचर यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असून गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना आदींच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश देण्यात आले.
दरम्यान जनजीवन मिशन अंतर्गत मुदतीत पूर्ण न होणाऱ्या कामांच्या ठेकेदारांना दंड लावण्यात यावा तसे दिरंगाई बाबत कारंवाई करावी तसेच रस्त्या च्या कडे ने नितृष्ठ दर्जाचे पाईप लाईन करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत विजेचे खांब पावसाळ्याच्या आधी बदलेले जावेत तसेच पाणी योजने साठी वेगळी नवीन डीपी देण्यात यावी पांचाळे गावच्या पुनर्वसणा साठी एका वेळी ८३ घरांना घरकुल योजनेतून निधी मिळावा फॉरेस्ट मुळे थांबलेलि आहुपे रस्त्या चे काम तात्काळ चालू करण्यात यावे.
यावेळी रामदास वळसे, आदिवासी नेते अमोल अंकुश, पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप, युवक कार्याध्यक्ष निलेश बो-हाडे, माजी सभापती संजय गवारी, तिरपाड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सोमा दाते, अडीवरेचे सरपंच संगीताताई किर्वे, असाणेचे माजी उपसरपंच रामदास भोगटे, माळीनचे उपसरपंच हेमंत भालचिम, गणेश झांजरे, बोरघरचे सरपंच विजय जंगले, अनंथा साळवे, सखाराम गभाले, मुद्गुन गुरुजी, दत्ता गवारी, सुरेखाताई जढर, संतोष शेळके, नामदेव असवले, समीर घारे, काळू जढर शंकर लांगी आधी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मंचर शहर अध्यक्ष धुभम बाणखेले व विविध खात्यांचे अधिकारी तसेच आहुपे, पिंपरगणे, तिरपाड, दिगद, कोंढरे, आसाने, माळीन, पंचाळे, अडिवरे, बोरघर फुलवडे या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Rajesh Chandrakant Chaskar
March 6, 2025 at 11:53 am
जनतेने आपल्याला का नाकारले समजल्यावर जनतेच्या समस्या काय आहे हे जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचं आज एसटी बस समस्या केवढी गंभीर आहे ह्या समस्येचं निवारण करायला लोकांना दुसऱ्या तालुक्याच्या आमदाराकडे जावा लागेल का?
अमोल अंकुश
March 6, 2025 at 12:34 pm
पूर्वाताई यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून युवा वर्गात लोकप्रिय होत असून दादा व साहेब यांना मानणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ताई काम करत आहेत यामुळे लवकरच राजकीय,सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारी युवा पिढी आपल्याला पाहावयास मिळेल.