सामाजिक
“भिर्र”…. “झाली”…. बैलगाडा शर्यतीवरील बंदीचे निषेधार्थ झालेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून माजी खा. शिवाजीराव आढळराव याच्यासह ६७ जणांची निर्दोष मुक्तता:” पेठे भरवत आनंद साजरा”….
मंचर प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी मंचर ता आंबेगाव येत झालेल्या आंदोलनात माजी खा शिवाजीराव आढळराव यांच्यासह ६७ शेतकऱ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातून खेड सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भिर्र…… झाली…..म्हणत व एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, सुमारे वीस वर्षापूर्वी अनेक प्राणीमित्र संघटनांनी बैलावर होत असलेल्या अत्याचारा विरोधात न्यायालयात दाद मगीतलीयावर न्यायालयाने प्राणी मित्र संघटनाची बाजी समजावून घेत बैल गाडा शर्यतीवर बंदी घातली यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरून मंचर ता आंबेगाव या ठिकाणी बैल गाडा संघटनांचे वतीने आंदोलन करण्यात आले होते यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दिवंगत नेते माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्यासह सुमारे ६७जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बैल गाडा शर्यतीला शासनाने मंजुरी देऊनही या शेतकऱ्यावरील गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आले नव्हते तब्बल वीस वर्षानंतर खेड सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी पुराव्या अभावी सर्व बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता केली.
सुमारे वीस वर्षापासून अविरत सुरु असलेल्या या लढ्याला अखेर न्याय मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माकजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत एकमेकांना पेठे भरवत आनंद साजरा केला या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त करताना माजी खा आढळराव पाटील म्हणाले कि, मी पहिल्यांदाच खासदार झालो असताना पहिल्याच टर्मच्या सात महिन्यात बैल गाड्यावर बंदी आली या वेळी झालेले आंदोलन शांतपणे होऊन सुद्धा तब्बल दोन वर्षा नंतर येथील राजकीय दाबावापोटी माझ्या सह सर्व आंदोलकांवर तीनशे सात कलम लावण्यात आले परंतू शेवटी सत्याचा हा नेहमीच विजय होतो त्या प्रमाणे आम्हाला न्याय मिळाला.
यावेळी पुढे बोलताना माजी खा.आढळराव पुढे म्हणाले कि,“घोडीवर बसून अनेकांनी दावे केले की, माझ्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. पण त्यात अजिबात तथ्य नाही. शर्यतीसाठी कोणाचा किती त्याग आहे. हे जनतेसमोर आहे.अशी टिका त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव नाव न घेता केली.
दरम्यान आढळराव पुढे म्हणाले कि, मी अनेक बैलगाडा घाटात उपस्थित असतो. सध्या बैलगाडा शर्यतीला बाजारो स्वरूप आले आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाने व प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यासाठी अनेक निकष आहेत. बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात काहीच नसते तसेच देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीऐवजी वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविल्या जातात.
दरम्यान प्रशासन नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जर पेटासारख्या संस्था पुन्हा कोर्टात गेल्या. तर बैलगाडा शर्यती पुन्हा अडचणीत येऊ शकतात.त्यासाठी सर्वांनी न्यायालय व शासनच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.” तसेच गावोगावी भरणाऱ्या शर्यती या फक्त ग्रामदैवत यांच्यासाठी भरविण्यात याव्यात त्या फक्त एक ते दोन दिवसांच्या असाव्यात असे मत देखील आढळराव पाटील यांनी बोलताना मांडले
यावेळी बैलगाडा मालक व आढळराव पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन सागर काजळे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.