सामाजिक
आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे “शेती पिकासह रस्त्या सोबत इतर सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे” मोठ्या प्रमाणावर नुकसान…..
मंचर दि (प्रतिनिधी) – मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यांमध्ये भातशेती सह हिरडा आणि जनावरांच्या चाऱ्याचेहि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला मोठा फटका बसला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच कहर सुरु असून आंबेगाव तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या चार दिवसांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीज खांब व तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे बऱ्याच ठिकाणी रस्ते व मोऱ्या वाहून गेल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच डिंभे खुर्द ते डिंभे बु. रस्ता पावसाने वाहून गेला असून गोहे खु. ते धुमाळवाडी रस्ता खचला आहे.
दरम्यान विविध ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोंढवळ येथे झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. त्याचप्रमाणे डिंभे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने धरणाची पाण्याची पातली वाढत आहे. डिंभे धरणाच्या कालवे दुथाडी भरून वाहत आहेत
त्याच प्रमाणे तालुक्यामध्ये झालेल्या पावासामुळे अनेक ठिकाणी बाजारी कांदा पासले भाज्या याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील जांबुत, टाकळी हाजी आणि पिंपरखेड या भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंबाच्या पिकासह शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे फळांच्या बागाचे नुकसान झाले आहे. यावेळी विविध समस्यांना व पूर परिस्थितीला मात करण्यासाठी प्रशासनामार्फत त्वरित काम सुरु करण्यात आले असून अतिवृष्टीग्रस्त व आदिवासी भागात मदतकार्य देखील सुरू आहे.
याप्रसंगी माजी सभापती सुभाषराव मोरमारे, प्रकाशराव घोलप, संजय गवारी, मारुती लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते हनुमान इष्टे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले व इतर कार्यकर्ते स्थानिक नागरिकांना घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. तसेच आंबेगावचे प्रांताधिकारी श्री. गोविंद शिंदे आणि शिरूरच्या प्रांताधिकारी श्रीमती पूनम अहिरे यांना नुकसानीचे पंचनामे करून व सार्वजनिक मालमत्तेची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.