सामाजिक
“वळवाच्या” प्रचंड पावासामुळे आदिवासी शेकऱ्यांचे हिराड्याचे उत्पन्न वाया,: “पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी”
घोडेगाव दि (प्रतिनिधी) आदिवासी पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे नागदि उत्पादन असलेल्या हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसाने मोठे नुकसान झाले असल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी या पिकाचे पंचनामे करून नुकसाना भरपाई मिळावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते दूंदा घोईरतयांनी केली आहे
खेड,जुन्नर व आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे बाळ हिरडा हे महत्वाचे उत्पादन असून मे महिना सुरु असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हिरडा वालण्यासाठी मैदाणात वाळविण्यासाठी ठेवला होता. परंतू गेली अनेक दिवस सुरु असलेल्या वळवाच्या प्रचंड पावसाने तसेच हा हिरडा ठेवण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांकडे व्यवस्थित जागा उपलब्ध नसल्याने वाळविण्यासाठी ठेवलेल्या हिराड्यापैकी मोठ्या प्रमाणावर हिरडा ओला होऊन खराब झाला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे हा हिराडा आणखीची खराब झाला असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोनी तिरपाड आहिपे पांचाळे पोखरी जंभोरी अडीवरे भीमाशंकर व पाटण खोऱ्यातील विविध भागात हिराड्याचे मोठ्या प्रमानावर उत्पादन घेतले जाते. हिराडा ह येथील आदिवासी शेतकऱ्यांचे महत्वाचे उत्पादन आहे परंतू हेच उत्पादन खराब झाल्याने आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे
दरम्यान या खराब झालेल्या हिरद्याचे तहसीलदार व वन खात्याचा अधिकाऱ्यांकडून त्वरित पंचांनामे करून आदिवासी शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,दुंदा घोईरत यांची मागणी आहे