सामाजिक
“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?
मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे
दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.
दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का? या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
प्रा.अनिल नारायण निघोट
June 4, 2025 at 12:45 pm
सत्ताधारी पक्षाचे आंबेगाव तालुक्यातील लोक समाजसेवक म्हणून बुरखा पांघरून हजारो लोकांना बोगस मजूर नोंदवून त्यासाठी हजारावर पैसे घेऊन तर गरिबांकडुन हजारावर कमीशन घेऊन फुकटच्या योजनेत दलाली कमवुन लाखो रुपयांची माया या एजंटांच्या साखळी ने जमा केली , तालुक्याच्या पूर्व पटट्यात हे प्रमाण सर्वाधिक असून त्या एजंटांंपैकी काहिंची नुकतीच एका गल्ली ते दिल्ली पक्षाचे पदाधिकारी म्हणून निवड झालीय,सत्तेचा ईतका गैरवापर कोणत्याही पक्षाने केला नाही,बरं ज्यांना मिळालंय ते कधी लोकांच्या बांधावर पण गेले नाही तरी मजूर, एकेका घरातील पाच सहा लाभार्थी,ही के़वळ एजंटांची कृपा,वर हजार दोन हजारात दहा हजारांची भांडी, शिष्यवृत्ती आरोग्य अशा बत्तीस योजनांचा आयता लाभ,मिळत असल्याने लाभार्थी कशाला पुढं येऊन पैसे दिल्याचे सांगतील? पत्रकारांनी गावोगावी जाऊन माहिती घ्यावी गरीबांचे लाखो रुपये गोळा करणारे धंदेवाईक राजकारणी, संबंधित अधिकारी ऊघडे पाडावेत, सत्ताधारी पक्षाने मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी संबंधितांची चौकशी करून खटले दाखल करून या समाजकंटकांना धडा शिकवावा!