सामाजिक
“मी म्हणजे जनसेवक, इतर सर्व लाभार्थी,”हीच भूमिका बाळगणारे तर खरे “स्वार्थी”

मंचर दि. (प्रतिनिधी)जोपर्यंत स्वतःला लाभाची पदे उपभोगास मिळतात, तो पर्यंत आम्ही “एकनिष्ठ समाजसेवक”, पण आपलें पद दुसऱ्यांकडे मिळाले, तो दुसरा मात्र लाभार्थी असा एक जावई शोध लावणाऱ्या अशा काही अल्प संतुष्ट् लोकांना “आद्य लाभार्थी” म्हणावे लागेल. व अशा “आद्य लाभार्थी” स्वयंघोषित कथाकथित पुढऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे तालुक्यातील वित्तीय संस्थासह , जनतेचे सामाजिक सौख्य अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“विधायतेतून मोक्ष मिळतो, तर स्वार्थातून कापाळ मोक्ष” शेवटी तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार…..अ-कारणपणे (काहीशा स्वार्थी भूमिकेतून) काही “आद्य लाभार्थी”कडून सुरु केलेल्या असुयेच्या राजकारणाने आंबेगाव तालुक्यातील सुसंस्कृतपणावर मलिनता येऊ लागली आहे.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तालुक्याचे काहीही होवो माझा स्वार्थ साध्य झालाच पाहिजे अशीच काहीशी वृत्ती तालुक्यातील या “आद्यलाभार्थी” मुळे बळावू लागल्याचे दिसून येत आहे. यात कोण चूक कोण बरोबर यात जाणे हिताचे नाही पण तालुक्यात सुरु असलेली मतभिन्नता आता मनःभेदापर्यंत येऊन पोहचली आहे. मतभेद संपविता येतात पण मनःभेद मात्र हृदयावर जणू, पाषाणावर (दगडावर)छन्नी हातोडीने कोरलेल्या खुणा निर्माण करून जातात. व यातून निर्माण होणारी “असुया” अग्नीप्रमाणे हृदयातील होमकुंडात कायम प्रज्वलीत राहते . तोच अहंकारचा अग्नी इतरां अगोदर स्वतः चे सर्वस्व संपवून टाकू शकतो याचा अंदाज या “आद्य लाभार्थी” ना समजला तर सर्वांनाच्याच हिताचे होईल. यात शंका नाही.

एके काळी राजकारणामुळे एकमेकांचे तोंड न पाहाणारे दोन मित्र आता एकमेकांसाठी मैत्रीच्या अनाभका घेत आहेत, तर कालपर्यंत आपल्या गुरुसमान नेत्याचे प्रत्येक कार्यक्रमात नाव घेतल्याशिवाय क्षणहि वाया जाऊ न देणारा कार्यकर्ता,आज मात्र गुरुच्या विरोधात बेफाम बोलत आहे. हि समाज हिताची विधायक वैचारीक लढाई नसून फक्त वर्चस्व व स्वार्थासाठीची लढाई कुणासाठी आहे यात शंका नसून यातून नक्की कोणते विधायक कार्य होईल कि कुणाचा फायदा होईल याकडे तालुक्यातील जनतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
लाभार्थी नक्क्की कोणाला म्हणणार?
सध्या तालुक्यात लाभार्थी कार्यकर्ते हा “शब्द”सर्वत्र विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातात्याने उच्चाराला जातो. परंतु लाभार्थी या शब्दाचा उच्चार करणारे आजचे विरोधकच काही काळापूर्वी तालुक्यातील अनेक नावाजलेल्या संस्थावर विविध उच्च पदे भोगत, सत्तेचा माज करत होते. तेच एकेकाळ स्वतःला निष्ठावंत म्हणणारे आजचे विरोधक म्हणजेच अगोदरचे लाभार्थीच होते. हेच ते आद्य लाभार्थी आता आपल्या नेत्याला नावे ठेवत त्यांच्या घराचे वासे मोजत आहेत मग खरे गद्दार कोण हाही एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. हे आजचे विरोधक असलेल्या या “आद्य लाभार्थीची” भूमिका म्हणजे . म्हणतात ना… “सौ चुहे खाके बिल्ली चली हज को” अशीच काहीशी स्थिती आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

काल पर्यंत नेत्यांची मर्जी सांभाळून पदे उपभोगताना आम्ही एकनिष्ठ आहोत असे सांगणारे सध्याचे विरोधक(आद्य लाभार्थी) मात्र पदावरून पाय उतार झाल्यानंतर ते पद इतरांना मिळाल्यावर, दुसरा व्यक्ती मात्र लगेच “लाभार्थी” असल्याची बोंबाबोंब करत नागरिकांनातून सहानुभूती मिळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो परंतु या आद्य लाभर्थिंच्या बदलत्या हवामाना प्रमाणे मारल्या जाणाऱ्या माकडउड्यां पाहुन मात्र जनतेचे मनोरंजनच होत आहे. यात शंका नाही.

तालुक्यातील संस्था उभ्या करण्यासाठी अनेकांना घाम गाळावा लागला रक्ताचे पाणी करावे लागले. त्यामुळे तालुक्यात अनेक युवकांना रोजगार प्राप्त झाला म्हणातात ना.. ” मोडणे सोपे पण,जोडणे मात्र अवघड” मग तालुक्यात नावारूपाला आलेल्या संस्थांवर जाहीर वक्तव्य करून त्यांची गच्छंती करण्यापेक्षा आपण त्या संस्थेमध्ये संचालक अथवा पदाधिकारी असताना त्याविषयी संचालक मंडळासमोर विरोध दाखवून समाज हिताचे काम करणे म्हणजे समाज कार्य होईल कि ते जाहीर सभांमधून विरोधी वक्तव्य करून हे समजणे आवश्यक आहे. सत्तेतून राजकारण व राजकारणांतून सत्ता मिळविण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या असुयेपोटी होणाऱ्या आरोपांमुळे नावलौकिक पावलेल्या संस्थाच्या मुळावर घाव घालून त्या संस्थाचा पाया निकामी करू नये, कारण याच संस्थामध्ये काम करीत असलेले कामगार याच तालुक्यातील काही तरुण असून ते आपली स्वतःच्या बौद्धिक शौक्षणिक कार्यक्षमता सिद्ध करून प्रामाणिकपणे काम करीत आहेत.मग हेही तुम्हाला लाभार्थी वाटतात का?

तालुक्यात अनेक संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील शेकडो गरजवंत कुटुंबं आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्या तरुणांना आपलें विरोधक म्हणत त्यांना लाभार्थी अशी उपामा देणे विरोधकांना कितपत योग्य वाटते याचा विचार होणे गरजेचे आहे.काही कथाकथित पुढऱ्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे संस्थांच्या अस्तित्वाला धक्का बसला तर तालुक्याती जनता या काथकथित पुढऱ्यांना कधीच माफ करणार नाही.त्यामुळे तालुक्याच्या मुळावर जाणारे राजकारण करण्यापेक्षा विधायक काम करून पुढील पिढी सक्षम करण्यासाठी राजकारण होणे अपेक्षित आहे.
सामाजिक
शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.
सामाजिक
“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते
दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.
“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा”
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.
सामाजिक
अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय10 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय10 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय12 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
Sudhir kale
September 7, 2024 at 2:20 pm
Very nice. Keep it up
Good wishes.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 7, 2024 at 2:34 pm
लेखकांनी मांडलेले मत शंभर टक्के खरं आहे . परंतु लाभार्थी किंवा आद्य लाभार्थी हा जो काही प्रकार चालू आहे .ही एकमेकांची विरोधक मानण्यापेक्षा या दोन्ही टोळ्या एकाच घरातले आहेत आणि ह्या टोळ्या एकमेकांना संपवण्यासाठी जे काही राजकारण करत आहेत त्याचा आंबेगाव तालुक्याच्या जनतेला वीट आलेला असून आंबेगाव तालुक्यातील जनतेने उद्या दोन्ही टोळ्यांना बाजूला सारून जर तिसरा पर्याय जर निवडला तर आश्चर्य वाटायला नको एवढंच तालुक्यातील जनतेच्या वतीने मला सांगूशी वाटतं .
प्रशांत
September 7, 2024 at 8:21 pm
एक पुरुष घर पाहतो वय झाले कि तो एक ना एक दिवस घरी बसतोच म्हणजे कुटुंब थांबत नाही पुढची पिढी मुले ते कुटुंब डगमगत का होईना सांभाळतात पुढे घेऊन जातातच बंद नाय पडू देत