सामाजिक
आंबेगावचा फुललेला “वसंत”…काळाच्या पडद्याआड…..! -जेष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे दि -(प्रतिनिधी)जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा प्रशासक काळ संपून मार्च 1992 मध्ये निवडणुका झाल्या. वसंतराव भागुजी भालेराव, बीएससी ऍग्री झालेला हा युवक आंबेगाव पंचायत समितीचा सभापती झाला. या दरम्यान मी ‘लोकसत्ता’ चा बातमीदार होतो. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अशी एकत्र मिळून पंचायत समिती होती. आज आमदारांना विकास कामांचे अधिकार एकवटले आहे. त्यावेळी पंचायत राज व्यवस्थेमध्ये आमदारांपेक्षाही किंबहुना थोडे जादा अधिकार पंचायत समिती सभापतींना होते. वसंतराव सभापती असले तरी त्यांच्यापुढे तगडे विरोधक त्यावेळी होते. सभापती हे जिल्हा परिषदेचे देखील पदसिद्ध सदस्य असल्याने त्याकाळी वसंतराव हे उच्चशिक्षित आणि मुद्देसूद मांडणी यामुळे सभागृहात ते लक्षवेधी ठरवायचे.
आंबेगाव पंचायत समितीचे सभापती असताना वसंतराव यांनी अनेक चांगले बदल आणि धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले. विशेषता त्याकाळी आदिवासी भागामध्ये रस्ते, उन्हाळ्यात वाड्यावर त्यांवर सुरू करावे लागणारे टँकर, प्राथमिक शाळांच्या खोल्या, गुणवत्ता वाढीचे प्रकल्प.अंगणवाड्या इमारती, शेती विषयक योजना आणि विशेषता खरीप हंगामा आढावा बैठकीमध्ये सभापती भालेराव यांचे असणारे अभ्यासपूर्ण विवेचन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील चकित पाडणारे असायचे. पाणीटंचाई, खरीप हंगाम आढावा बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती उपस्थित असायचे. अशावेळी भालेराव यांनी मांडलेले मुद्दे हेच बैठकीचे दिशादर्शक ठरायचे. अशा बैठकांमध्ये आंबेगाव चा हा’ वसंत ‘नेहमी फुललेला असायचा. त्यामुळे त्यांची छाप सगळ्यांवर पडायची.
लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय वाहन असलेले सभापती हे तालुक्यामध्ये एकमेव पदाधिकारी असायचे. सदस्यांकडे स्वतःची चार चाकी सोडा, दुचाकी देखील नव्हती. सभेला उशीर झाला. आणि मुक्कामी एसटी घोडेगाव किंवा मंचर वरून निघून गेली तर अनेकदा भालेराव हे शासकीय वाहन इतर सहकारी सदस्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पाठवून द्यायचे आणि स्वतः मात्र इतर व्यवस्था करून कळंबला जायचे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची सभा असेल तर हातात कागदपत्रांची फाईल, डायरी घेऊन ते सभेला जायचे.
अभ्यासू, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कामाचे वेगळेपण यामुळे अल्पावधीतच त्यांची आंबेगाव तालुक्याला आणि जिल्ह्याला देखील ओळख झाली. सभापती होण्यासाठी अनेक जण इच्छुक असायचे, परंतु भालेराव यांना हटवणे तालुक्यातील नेतृत्वाला त्यावेळी अशक्य झाले.
मी पुण्यात सामना मध्ये दाखल झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये भेट व्हायची. पत्रकार विठ्ठल जाधव ही माझी ओळख असली तरी मला ते आवर्जून विठ्ठलराव म्हणायचे. पुण्यातील पत्रकारितेमध्ये आपले कुणीतरी आहे. याचे त्यांना विशेष वाटायचे. आंबेगाव मध्ये सभापती भालेराव हे भविष्यातील स्पर्धक आहेत. हे ओळखून त्यांना राजकीय दृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अनेक राजकीय चढउतारा आणि नेते बघितले.मात्र त्यांनी स्वतःचे कर्तुत्व आणि अधिष्ठानाच्या जोरावर सभापती पदाची कारकीर्द यशस्वी आणि गौरवास्पद केली.
1997 नंतरची त्यांची राजकीय वाटचाल ही नेहमीच कुणाला तरी फायदा करून देणारी ठरली. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली. काही कालखंड ते स्थानिक राजकारणात व्यस्त राहिले. नंतरच्या टप्प्यात सहकार आणि बाजार समितीच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन ते आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती झाले. मंचर बाजार आवाराला नवा आयाम देण्यामध्ये सर्वात मोठा वाटा राहिला. शेतकरी केंद्रस्थानी म्हणून त्यांनी नव्याने गाळे आणि बाजार उभारणी केली. बाजार समितीच्या कामासाठी अनेकदा ते पुण्यात जिल्हा सहकार उपनिबंधक आणि पणन संचालक कार्यालयामध्ये वारंवार भेटवायचे. नवीन काय करतोय ते सांगायचे. जनहिताची त्यांची ही धडपड अखेरपर्यंत कायम होती. वसंतराव हा झेप घेणारा माणूस. स्पष्ट आणि परखड बोलणारा.पॉवर पॉलिटिक्स मध्ये अशा माणसांना नेहमीच अंडरस्टमेंट केले जाते. वसंतरावांना त्याही गोष्टीला सामोरे जावे लागले. परंतु तरीदेखील वसंतराव यांची राजकीय कार्तिक दही संस्मरणीय आणि दिशादर्शक ठरली. एक-दीड वर्षापूर्वी त्यांची अशीच भेट झाली. आजारपणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत होत्या. तरी देखील मोठ्या उत्साहाने आणि दमदारपणे बोलताना त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. वसंतराव यांचे अकाली जाणे मनाला वेदना देणारे, जनमानसात वसंतराव यांनी आपल्या कार्यकर्तुत्वामधून उमटवलेला ठसा प्रत्येकाच्या स्मरणात राहील.
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 20, 2024 at 11:41 am
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !